नवी दिल्ली - रेल्वेचे रिझर्व्हेशन करताना काही मिनिटांत तिकिटे संपून नशिबी येणारे 'वेटिंग' आता बदलेल. कारण रेल्वेने ऑनलाइन रिझर्व्हेशनसाठीचे नियम बदलले आहेत. एजंट्सवर वेळेचे बंधनही आणले आहे. त्यामुळे तिकीट 'नॉट अव्हलेबल'चा ताप कमी होईल.
तात्काळ तिकिटाची हमी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी तात्काळ आरक्षण प्रणालीत रेल्वे महत्त्वपूर्ण सुधारणा करणार आहे. १ जुलैपासून आयआरसीटीसीचे अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपद्वारे तात्काळ तिकिटांचे आरक्षण फक्त आधारने प्रमाणित केलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. १५ जुलै २०२५ पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल.
ओटीपी आवश्यकसंगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरवर आणि अधिकृत मध्यस्थांद्वारे (एजंट्स) आरक्षित तत्काळ तिकिटांसाठी आरक्षण करताना वापरकर्त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्रमाणीकरण पाठवणे आवश्यक असेल.
एजंट्ससाठी कोणता वेळ?बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी एजंट्सना प्रारंभिक दिवस तत्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या ३० मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत. वातानुकूलित श्रेणीसाठी हे निर्बंध सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत व बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी सकाळी ११:०० ते ११:३० या वेळेत लागू राहतील.
प्रवाशांना ॲप, वेबसाइटवर जाऊन काय करावे लागेल?या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवाशांना केले आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयआरसीटीसी युजर प्रोफाइलशी आधार लिंक केलेले असल्याची खातरजमा करावी. जर आधार लिंक केलेले नसेल तर तिकीट मिळणार नाही.
सर्व विभागांना गेल्या सूचनासीआरआयएस आणि आयआरसीटीसीला प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे आणि सर्व विभागीय रेल्वे आणि संबंधित विभागांना त्यानुसार माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.