शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ५० नवीन अमृत भारत ट्रेन धावणार; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 20:27 IST

Amrit Bharat Express: आताच्या घडीला अमृत भारत ट्रेन दोन मार्गांवर चालवल्या जात असून, ५० अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे.

Amrit Bharat Express: आताच्या घडीला भारतीय रेल्वेत वंदे भारत एक्स्प्रेसची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नवनवीन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. सामान्य प्रवाशांना वंदे भारतचे तिकीट परवडत नाही, यासाठी भारतीय रेल्वेने अमृत भारत ट्रेन सुरू केली. सध्या दोन अमृत भारत ट्रेनची सेवा सुरू असून, आगामी काळात ५० नवीन मार्गांवर अमृत भारत ट्रेन सुरू होणार आहेत, या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. 

३० डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली ते दरभंगा व्हाया अयोध्या आणि मालदा ते बंगळुरू या दोन मार्गांवर पहिल्या दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. सुरुवातीला याला वंदे भारत साधारण ट्रेन असे संबोधले गेले. देशातील काही मार्गांवर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यानंतर या ट्रेनचे नामकरण अमृत भारत ट्रेन करण्यात आले. सामान्य प्रवाशांचा या अमृत भारत ट्रेनला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. 

अमृत भारत ट्रेनचे मोठे यश, ५० नवीन मार्गांवर मंजुरी

विद्यमान अमृत भारत ट्रेनला मोठे यश मिळाले आहे. म्हणूनच आता ५० अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे. तसेच या पोस्टसोबत अमृत भारत ट्रेनचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. अमृत भारत ट्रेनला २२ डबे आहेत. १२ द्वितीय श्रेणी आणि ८ सामान्य श्रेणीचे डबे आहेत. याशिवाय गार्डचे दोन डबे आहेत. रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे. यासाठी एक स्पेशल सोय करून देण्यात आली आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात आले आहे. 

दरम्यान, विशेष बाब म्हणजे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये मेट्रोसारखे गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात. प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. बॉटल होल्डर देण्यात आला आहे. अशा अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कवच यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरांची नजर, बायो-वॅक्युम टॉयलेट्स, सेंसरवर आधारित नळ, प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना फलक, एलईडी लाइट्सचा उत्तम वापर, अशा काही गोष्टी अमृत भारत ट्रेनमध्ये दिल्या गेल्या आहेत. याशिवाय सेमी पर्मनंट कपलर्स या ट्रेनमध्ये लावले गेले आहेत. त्यामुळे गाडी सुटताना आणि ब्रेक लावल्यानंतर बसणारे धक्के बहुतांश प्रमाणात कमी होतील, असा दावा करण्यात आला आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव