शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: देशात आधीच भीषण कोळसा संकट, त्यानंतर आता सरकारने 1100 ट्रेन रद्द केल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:42 IST

Indian Railway: देशात सध्या भीषण कोळसा आणि वीज संकट उद्भवले असताना सरकारने 1100 ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

Indian Railway:  भारतावर भीषण कोळसा संकट उद्भवले आहे. या कोळसा संकटामुळे देशातील वीजेच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील 20 दिवस देशभरातील किमान 1100 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर प्रवाशांसह व्यापारी वर्गही नाराज झाला आहे. 

देशातील अनेक वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळसा संकटाचा सामना करावा लागत आहे. याला सामोरे जाण्यासाठी आणि कोळशाचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे 15 टक्के अतिरिक्त कोळशाची वाहतूक करत आहे. यामुळे रेल्वेने पुढील 20 दिवस सुमारे 1100 प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर या दोन्ही गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. एक्स्प्रेस गाड्यांच्या 500 फेऱ्या, तर पॅसेंजर गाड्यांच्या 580 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी गाड्या थांबवल्यारेल्वेच्या म्हणण्यानुसार, औष्णिक वीज केंद्राला कोळसा पुरवणार्‍या मालगाड्यांना मार्ग देण्यासाठी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील एक महिन्यासाठी रेल्वेने 670 पॅसेंजर गाड्या आधीच रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. विशेषतः छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड यांसारख्या कोळसा उत्पादक राज्यांतून ये-जा करणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

अनेक राज्यात विजेचे संकट देशात यंदा कडक उन्हाचा सामना करावा लागत असून त्यामुळे एप्रिल महिन्यापासून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विजेची मागणी वाढल्याने कोळशाचा वापरही वाढला आहे. पण, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा यासह अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटामुळे विजेची समस्या निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार