शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानकडून सुटका

By admin | Updated: January 21, 2017 19:47 IST

नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण मायदेशी परतले आहेत. भारतीय अधिका-यांनी वाघा बॉर्डरहून त्यांना ताब्यात घेतले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  भारतीय जवान चंदू चव्हाण यांची आज पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे. भारतीय अधिका-यांनी चंदू चव्हाण यांना वाघा सीमेहून ताब्यात घेतले आहे.  भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईनंतर चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते. 29 सप्टेंबर 2016पासून ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. चंदू चव्हाण यांच्या सुटकेच्या बातमीने संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. 
 
सप्टेंबर 2016 मध्ये उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली. या कारवाईनंतर 36 राष्ट्रीय रायफल्सचे जवान शिपाई चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले. 29 सप्टेंबर 2016 पासून ते आतापर्यंत चंदू चव्हाण पाकिस्तानच्याच ताब्यात होते. 
या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांसहीत संपूर्ण देश चिंतेत होता.
 
चंदू पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची बातमी समजल्याचा धक्का पचवू न शकलेल्या त्यांच्या आजीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  दरम्यान, चंदू चव्हाण यांना सुखरूप मायदेशी परत आणणार, असे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले. केंद्र सरकारने सातत्याने पाठपुरावा करत चंदू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानसोबत डीजीएमओ स्तरावर जवळपास 15 ते 20 वेळा चर्चा करण्यात आली.  मात्र या चर्चेला पाकिस्तानकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात आली. यामुळे चव्हाणांच्या सुटकेची प्रक्रियेला वेग येऊ लागला. 
 
यानंतर चंदू चव्हाण सुखरूप असून लवकरच त्यांना मायदेशी आणण्यात येईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली होती. अखेर आज केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून चंदू चव्हाण मायदेशी परतले आहेत.
 
जळगावात आनंदोत्सव
चंदू चव्हाण यांची सुटका झाल्याने जळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कल्याणी नगर येथे राहणा-या त्यांच्या काकू लताबाई पाटील यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.