शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

"बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, परिस्थिती नियंत्रणाबाहेर"; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:22 IST

अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सरकारची नजर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली.

Foreign Minister S. Jaishankar : बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात पोहोचल्या होत्या. भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. त्यानंतर आता हसीना यांनी भारतही सोडल्याचे बोलले जात आहे. अशातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील ताज्या परिस्थितीबद्दल सर्वपक्षीय बैठकीत माहिती दिली आहे. भारताच्या भूमिकेवर सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली. दुसरीकडे सरकार बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही जयशंकर यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथील अल्पसंख्याक समुदाय हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ला केला, त्यानंतर परिस्थिती चिघळली, असे  परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं. राजीनाम्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची परवानगी मागितल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

१२ हजार भारतीय बांगलादेशात

"बांगलादेशमध्ये आंदोलनांदरम्यान सर्वात चिंतेची बाब म्हणजे तिथल्या  हिंदू अल्पसंख्याकांच्या व्यापारी प्रतिष्ठानांवर आणि मंदिरांवर हल्ले झाले आहेत. मोदी सरकार ढाका प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. त्यांना त्यांचे राजदूत आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यास सांगितले आहे. एकूण २० हजार भारतीय बांगलादेशात आहेत. या गोंधळानंतर लगेचच आमच्या बाजूने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्यानंतर ८ हजार लोक भारतात परतले आहेत. मात्र  १२ हजार लोक आतापर्यंत तिथेच आहेत. बांगलादेशात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर आमचे सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. तिथल्या आंदोलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे," असे मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.

शेख हसीना यांच्यासोबत थोडक्यात चर्चा

"बांगलादेशात जुलैपासून हिंसाचार सुरू आहे. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने तेथील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला होता. असे असतानाही आंदोलने सुरूच होती. ४ ऑगस्टला परिस्थिती आणखीनच बिकट झाली. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. ५ ऑगस्ट रोजी संचारबंदी लागू करण्यात आली. असे असतानाही रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला. लष्करप्रमुखांनी देशाला संबोधित करत शांततेचे आवाहन केले आहे. हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता आणि अत्यंत कमी वेळात भारतात येण्याची परवानगी मागितली होती. या संपूर्ण घटनेनंतर  सीमेवर बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. तसेच सरकारने हसिना यांच्याशीही थोडक्यात चर्चा केली आहे," असेही परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत