शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! "या" उद्योगाला मिळणार नवसंजीवनी; 2021मध्ये 10 लाख लोकांना मिळणार रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 10:56 IST

Indian Food Services Industry : कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे फूड इंडस्ट्रीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्यासाठी लवकरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इंडियन फूड सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये नववर्षात 10 लाख नवे रोजगार निर्माण करण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट टेबल रिझर्व्हेशन कंपनी 'डाइनआउट'च्या रिपोर्टनुसार, नव्या वर्षात 45 टक्के तरुण वर्ग 'हेल्थ फूड'कडे वळण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार रेस्टॉरंटचा प्रामुख्याने भर हा गमावलेले ग्राहक परत मिळवण्यावर राहण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात म्हणजेच 2021मध्ये 90 टक्के रेस्टॉरंट डिजिटल मेन्यूंचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

'डाइनआउट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना संकटामुळे देशातील फूड सर्व्हिसेस इंडस्ट्री मोठ्या संकटातून जात आहे. मात्र सध्या हा उद्योग थोडा सावरत आहे.  पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 2021 मध्ये नव्याने जवळपास 10 लाख रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा चेहरामोहरा कमालीचा बदलला असून, हेल्दी फूडकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. क्लाउड किचनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, टेकअवे आणि होम डिलिव्हरींचे प्रमाण वाढत आहे."

होम डिलिव्हरीत 30 टक्के वाढ होऊ शकते

'डाइनआउट'च्या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार 2021 मध्ये ग्राहकांकडून संपर्कविरहित डिलिव्हरी आणि डिजिटल पेमेंटवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात टेकअवे ऑर्डरमध्ये 15 टक्के तर डिलिव्हरी ऑर्डरमध्ये 30.5 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. क्लाउड किचनचा बाजारहिस्सा सध्या 13 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर जाण्याचीही शक्यता आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत होम शेफची संख्या चौपटीने वाढण्याची शक्यता असल्याचे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

70 लाखांहून अधिक जणांना दिली होती रोजगाराची संधी 

गेल्या काही महिन्यांत कोरोना लॉकडाऊनमुळे ज्या व्यवसायांची अवस्था बिकट झाली होती. त्यामध्ये रेस्टॉरंटचा देखील समावेश आहे. लॉकडाऊननंतर अनेक नियमांचे पालन करून हा उद्योग कसाबसा उभा राहिला आहे. कोरोनाचे संकट येण्याआधी या क्षेत्राने सत्तर लाखांहून अधिक जणांना रोजगाराची संधी दिली. 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (एनआरआयए) आकडेवारीनुसार लॉकडाऊनमुळे तीस टक्क्यांहून अधिक रेस्टॉरंट आणि बीअर बार कायमस्वरूपी बंद झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :jobनोकरीfoodअन्न