शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

गुड न्यूज! "या" उद्योगाला मिळणार नवसंजीवनी; 2021मध्ये 10 लाख लोकांना मिळणार रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 10:56 IST

Indian Food Services Industry : कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे फूड इंडस्ट्रीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्यासाठी लवकरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इंडियन फूड सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये नववर्षात 10 लाख नवे रोजगार निर्माण करण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट टेबल रिझर्व्हेशन कंपनी 'डाइनआउट'च्या रिपोर्टनुसार, नव्या वर्षात 45 टक्के तरुण वर्ग 'हेल्थ फूड'कडे वळण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार रेस्टॉरंटचा प्रामुख्याने भर हा गमावलेले ग्राहक परत मिळवण्यावर राहण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात म्हणजेच 2021मध्ये 90 टक्के रेस्टॉरंट डिजिटल मेन्यूंचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

'डाइनआउट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना संकटामुळे देशातील फूड सर्व्हिसेस इंडस्ट्री मोठ्या संकटातून जात आहे. मात्र सध्या हा उद्योग थोडा सावरत आहे.  पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 2021 मध्ये नव्याने जवळपास 10 लाख रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा चेहरामोहरा कमालीचा बदलला असून, हेल्दी फूडकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. क्लाउड किचनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, टेकअवे आणि होम डिलिव्हरींचे प्रमाण वाढत आहे."

होम डिलिव्हरीत 30 टक्के वाढ होऊ शकते

'डाइनआउट'च्या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार 2021 मध्ये ग्राहकांकडून संपर्कविरहित डिलिव्हरी आणि डिजिटल पेमेंटवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात टेकअवे ऑर्डरमध्ये 15 टक्के तर डिलिव्हरी ऑर्डरमध्ये 30.5 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. क्लाउड किचनचा बाजारहिस्सा सध्या 13 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर जाण्याचीही शक्यता आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत होम शेफची संख्या चौपटीने वाढण्याची शक्यता असल्याचे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

70 लाखांहून अधिक जणांना दिली होती रोजगाराची संधी 

गेल्या काही महिन्यांत कोरोना लॉकडाऊनमुळे ज्या व्यवसायांची अवस्था बिकट झाली होती. त्यामध्ये रेस्टॉरंटचा देखील समावेश आहे. लॉकडाऊननंतर अनेक नियमांचे पालन करून हा उद्योग कसाबसा उभा राहिला आहे. कोरोनाचे संकट येण्याआधी या क्षेत्राने सत्तर लाखांहून अधिक जणांना रोजगाराची संधी दिली. 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (एनआरआयए) आकडेवारीनुसार लॉकडाऊनमुळे तीस टक्क्यांहून अधिक रेस्टॉरंट आणि बीअर बार कायमस्वरूपी बंद झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :jobनोकरीfoodअन्न