शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

गुड न्यूज! "या" उद्योगाला मिळणार नवसंजीवनी; 2021मध्ये 10 लाख लोकांना मिळणार रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 10:56 IST

Indian Food Services Industry : कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे फूड इंडस्ट्रीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्यासाठी लवकरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इंडियन फूड सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये नववर्षात 10 लाख नवे रोजगार निर्माण करण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट टेबल रिझर्व्हेशन कंपनी 'डाइनआउट'च्या रिपोर्टनुसार, नव्या वर्षात 45 टक्के तरुण वर्ग 'हेल्थ फूड'कडे वळण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार रेस्टॉरंटचा प्रामुख्याने भर हा गमावलेले ग्राहक परत मिळवण्यावर राहण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात म्हणजेच 2021मध्ये 90 टक्के रेस्टॉरंट डिजिटल मेन्यूंचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

'डाइनआउट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना संकटामुळे देशातील फूड सर्व्हिसेस इंडस्ट्री मोठ्या संकटातून जात आहे. मात्र सध्या हा उद्योग थोडा सावरत आहे.  पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 2021 मध्ये नव्याने जवळपास 10 लाख रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा चेहरामोहरा कमालीचा बदलला असून, हेल्दी फूडकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. क्लाउड किचनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, टेकअवे आणि होम डिलिव्हरींचे प्रमाण वाढत आहे."

होम डिलिव्हरीत 30 टक्के वाढ होऊ शकते

'डाइनआउट'च्या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार 2021 मध्ये ग्राहकांकडून संपर्कविरहित डिलिव्हरी आणि डिजिटल पेमेंटवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात टेकअवे ऑर्डरमध्ये 15 टक्के तर डिलिव्हरी ऑर्डरमध्ये 30.5 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. क्लाउड किचनचा बाजारहिस्सा सध्या 13 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर जाण्याचीही शक्यता आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत होम शेफची संख्या चौपटीने वाढण्याची शक्यता असल्याचे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

70 लाखांहून अधिक जणांना दिली होती रोजगाराची संधी 

गेल्या काही महिन्यांत कोरोना लॉकडाऊनमुळे ज्या व्यवसायांची अवस्था बिकट झाली होती. त्यामध्ये रेस्टॉरंटचा देखील समावेश आहे. लॉकडाऊननंतर अनेक नियमांचे पालन करून हा उद्योग कसाबसा उभा राहिला आहे. कोरोनाचे संकट येण्याआधी या क्षेत्राने सत्तर लाखांहून अधिक जणांना रोजगाराची संधी दिली. 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (एनआरआयए) आकडेवारीनुसार लॉकडाऊनमुळे तीस टक्क्यांहून अधिक रेस्टॉरंट आणि बीअर बार कायमस्वरूपी बंद झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :jobनोकरीfoodअन्न