शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

Indian Army: पाक, चीन नाही! भारतीय सैन्याच्या शस्त्र भांडाराला देशातूनच धोका; अतिक्रमणांनी वेढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:57 IST

एम्युनिशन डंप किंवा डेपोमध्ये सैन्याच्या गरजेनुसार गोळ्या, ग्रेनेड,बॉम्ब, माईन्स, रॉकेट आणि मिसाईल असतात. तसेच हे डेपो गरजेच्यावेळी वेगाने पुरवठा व्हावा यासाठी उभारलेले असतात.

गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्याला भीषण आग लागली होती. असाच धोका भारतीय सैन्याच्या शस्त्र भांडाराला उद्भवण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांच्या डेपोच्या आजुबाजुला पूर्वी घरे बांधली जात नव्हती. परंतू आता कोणाचाच धरबंध नसल्याने सर्रास अनधिकृत घरे, इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे या शस्त्रांच्या साठ्याला देशातच धोका निर्माण झाला आहे. 

भारतीय सैन्याच्या अनेक एम्युनेशन डंपजवळ आता अनधिकृत वसाहती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे चिता वाढली आहे. भारतीय सैन्य हा प्रश्न मांडत आहे, परंतू त्यांना स्थानिक यंत्रणांची मदत मिळत नाहीय. अनेक ठिकाणी द वर्क्स ऑफ डिफेंस एक्टचे पालन होत नाहीय, अशी सैन्याची तक्रार आहे. 

एम्युनिशन डंप किंवा डेपोमध्ये सैन्याच्या गरजेनुसार गोळ्या, ग्रेनेड,बॉम्ब, माईन्स, रॉकेट आणि मिसाईल असतात. तसेच हे डेपो गरजेच्यावेळी वेगाने पुरवठा व्हावा यासाठी उभारलेले असतात. स्फोटके असल्याने हे डेपो शहरांच्या एका बाजुला लोकसंख्येपासून दूर उभारण्यात आले आहेत. परंतू आता शहरे वाढू लागली असून ही लोकसंख्या आता या डेपोंच्या वेशीवर येऊन ठेपली आहे.

भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेचा विचार करून वर्क्स ऑफ डिफेन्स कायदा 1903 मध्ये लागू करण्यात आला होता. ज्यानुसार क्रिटिकल डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट (महत्त्वाचे संरक्षण आस्थापना) च्या आजूबाजूच्या जमिनीच्या वापरावर काही निर्बंध आहेत, परवानगीशिवाय तेथे बांधकाम करता येत नाही. या कायद्यांतर्गत तीन झोन आहेत. अ वर्ग झोनमध्ये 2000 यार्डपर्यंत परवानगीशिवाय जमिनीच्या वर कोणतेही बांधकाम करता येणार नाही. ब वर्ग झोनमध्ये 1000 यार्डपर्यंत परवानगीशिवाय बांधकाम किंवा झाडे लावता येणार नाहीत. क वर्ग झोनमध्ये 500 यार्डांपर्यंत परवानगीशिवाय जमिनीच्या वर किंवा खाली कुठेही बांधकाम करता येणार नाही.

परंतू एम्युनिशन डंप बडोवाल (लुधियाना), एम्युनिशन डंप वाला (अमृतसर), एम्युनिशन डंप पुलगाव (महाराष्ट्र), एम्युनिशन डंप भटिंडा या ठिकाणी नियमांचे सर्वाधिक उल्लंघन झाले आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण झाले आहे. यापैकी अनेक प्रकरणे न्यायालयात पेंडिंग आहेत. यामुळे सैन्यासह नागरिकांनाही य़ापासून धोका आहे. 2016 मध्ये, पुलगाव येथील दारूगोळा डेपोला भीषण आग लागली, ज्यात 11 जवान शहीद झाले होते. 2010 मध्ये पानागढच्या डेपोमध्ये आग लागली आणि त्यानंतर अनेक स्फोट झाले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानEnchroachmentअतिक्रमण