शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज - अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:48 IST

डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे अशी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, दि. 11 - डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे असं वक्तव्य केलं आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. डोकलाममधील वाद सुरु असताना चीनकडून तिबेटमध्ये सुरु असलेल्या हालचालींचा रिपोर्ट आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिका-याने आपली सुरक्षा भारतापेक्षा उत्तम असल्याचा केलेला दावा यासंबंधी अरुण जेटलींना प्रश्न विचारण्यात आला होता. 

अरुण जेटली यांनी सांगितलं की, 'आपलं सैन्य कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे'. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराकडे पुरेशी साधनं उपलब्ध असून, यासंबंधी शंका असण्याचं कोणतंच कारण नाही असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे.

याआधीही अरुण जेटली यांनी लोकसभेत बोलताना डोकलामच्या वादावर भाष्य केलं होतं. अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं होतं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे'. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती. 

याआधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसेदत दिलेल्या आपल्या भाषणात, फक्त चर्चेने हा मुद्दा सुटू शकतो असं सांगितलं होतं. त्या बोलल्या होत्या की, 'दोन्ही पक्षांनी एकत्र बसून शांतपणे या मुद्द्यावर चर्चा करत उपाय शोधला पाहिजे'. तिकडे चीनी मीडिया वारंवार युद्धाची धमकी देत आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्रांमध्ये तर दर दिवशी भारतासोबत युद्ध छेडण्याची धमकी देणारी बातमी छापली जात आहे. 

याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.