शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज - अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:48 IST

डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे अशी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, दि. 11 - डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे असं वक्तव्य केलं आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. डोकलाममधील वाद सुरु असताना चीनकडून तिबेटमध्ये सुरु असलेल्या हालचालींचा रिपोर्ट आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिका-याने आपली सुरक्षा भारतापेक्षा उत्तम असल्याचा केलेला दावा यासंबंधी अरुण जेटलींना प्रश्न विचारण्यात आला होता. 

अरुण जेटली यांनी सांगितलं की, 'आपलं सैन्य कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे'. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराकडे पुरेशी साधनं उपलब्ध असून, यासंबंधी शंका असण्याचं कोणतंच कारण नाही असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे.

याआधीही अरुण जेटली यांनी लोकसभेत बोलताना डोकलामच्या वादावर भाष्य केलं होतं. अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं होतं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे'. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती. 

याआधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसेदत दिलेल्या आपल्या भाषणात, फक्त चर्चेने हा मुद्दा सुटू शकतो असं सांगितलं होतं. त्या बोलल्या होत्या की, 'दोन्ही पक्षांनी एकत्र बसून शांतपणे या मुद्द्यावर चर्चा करत उपाय शोधला पाहिजे'. तिकडे चीनी मीडिया वारंवार युद्धाची धमकी देत आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्रांमध्ये तर दर दिवशी भारतासोबत युद्ध छेडण्याची धमकी देणारी बातमी छापली जात आहे. 

याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.