शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज - अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:48 IST

डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे अशी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, दि. 11 - डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे असं वक्तव्य केलं आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. डोकलाममधील वाद सुरु असताना चीनकडून तिबेटमध्ये सुरु असलेल्या हालचालींचा रिपोर्ट आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिका-याने आपली सुरक्षा भारतापेक्षा उत्तम असल्याचा केलेला दावा यासंबंधी अरुण जेटलींना प्रश्न विचारण्यात आला होता. 

अरुण जेटली यांनी सांगितलं की, 'आपलं सैन्य कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे'. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराकडे पुरेशी साधनं उपलब्ध असून, यासंबंधी शंका असण्याचं कोणतंच कारण नाही असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे.

याआधीही अरुण जेटली यांनी लोकसभेत बोलताना डोकलामच्या वादावर भाष्य केलं होतं. अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं होतं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे'. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती. 

याआधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसेदत दिलेल्या आपल्या भाषणात, फक्त चर्चेने हा मुद्दा सुटू शकतो असं सांगितलं होतं. त्या बोलल्या होत्या की, 'दोन्ही पक्षांनी एकत्र बसून शांतपणे या मुद्द्यावर चर्चा करत उपाय शोधला पाहिजे'. तिकडे चीनी मीडिया वारंवार युद्धाची धमकी देत आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्रांमध्ये तर दर दिवशी भारतासोबत युद्ध छेडण्याची धमकी देणारी बातमी छापली जात आहे. 

याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.