शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गलवान झटापटीचा व्हिडीओ आर्मीने आधी युट्यूबवर टाकला; आता डिलीट केला, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 10:37 IST

गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष, भारताचे २० जवान शहीद झालेले. चिनी लष्कर काटेरी लाठ्या काठ्या घेऊन आलेले... भारतीय सैनिकही शूर होते, त्यांना मृत्यू समोर दिसत होता, चीनचे ४० सैनिक मारले...

कोरोना काळात भारत आणि चीनमधील तणाव वाढला होता. यातच चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करून भारतीय सैनिकांवर काटेरी लाठ्या, काठ्यांनी हल्ला केला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारतीय सैनिकांनी ४० हून अधिक चिनी सैनिकांना ठार केले होते. या घटनेचा व्हिडीओ भारतीय लष्कराने काही काळापूर्वीच युट्युबवर पोस्ट केला होता. परंतु, लगेचच तो डिलीट करण्यात आला आहे. 

गलवान खोऱ्यात हा हल्ला झाला होता. पाण्याच्या वेगवान प्रवाहात ही झटापट झाली होती. या झटापटीवेळी भारतीय सैनिकांनी चीनच्या सैन्याला त्याच भाषेत प्रतिकार करत मोठे नुकसान पोहोचविले होते. याची यशोगाथा सांगणारा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. यामुळे आर्मीच्या मुख्यालयाने हा व्हिडीओ डिलीट करायला लावला आहे. 

व्हिडीओ १३ जानेवारीला पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये भारतीय जवानांच्या शौर्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच LAC वर अद्याप उघड न केलेल्या माहितीचाही उल्लेख होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनताच लष्कराच्या मुख्यालयात धावपळ उडाली होती. 

वेस्टर्न कमांडची गुप्त माहिती आणि ऑपरेशनची माहिती व्हिडिओवर टाकल्याबद्दल अद्याप मुख्यालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर काहीही बोलण्यास आर्मीच्या मुख्यालयातून नकार देण्यात आला आहे. 5-6 मे 2020 रोजी पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर एक मोठी घटना घडली होती. यानंतर 15 जून रोजी गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. ज्यामध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले होते. या युद्धात 40 हून अधिक चिनी सैनिक मारले गेले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव