शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गलवान झटापटीचा व्हिडीओ आर्मीने आधी युट्यूबवर टाकला; आता डिलीट केला, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 10:37 IST

गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष, भारताचे २० जवान शहीद झालेले. चिनी लष्कर काटेरी लाठ्या काठ्या घेऊन आलेले... भारतीय सैनिकही शूर होते, त्यांना मृत्यू समोर दिसत होता, चीनचे ४० सैनिक मारले...

कोरोना काळात भारत आणि चीनमधील तणाव वाढला होता. यातच चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करून भारतीय सैनिकांवर काटेरी लाठ्या, काठ्यांनी हल्ला केला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारतीय सैनिकांनी ४० हून अधिक चिनी सैनिकांना ठार केले होते. या घटनेचा व्हिडीओ भारतीय लष्कराने काही काळापूर्वीच युट्युबवर पोस्ट केला होता. परंतु, लगेचच तो डिलीट करण्यात आला आहे. 

गलवान खोऱ्यात हा हल्ला झाला होता. पाण्याच्या वेगवान प्रवाहात ही झटापट झाली होती. या झटापटीवेळी भारतीय सैनिकांनी चीनच्या सैन्याला त्याच भाषेत प्रतिकार करत मोठे नुकसान पोहोचविले होते. याची यशोगाथा सांगणारा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. यामुळे आर्मीच्या मुख्यालयाने हा व्हिडीओ डिलीट करायला लावला आहे. 

व्हिडीओ १३ जानेवारीला पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये भारतीय जवानांच्या शौर्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच LAC वर अद्याप उघड न केलेल्या माहितीचाही उल्लेख होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनताच लष्कराच्या मुख्यालयात धावपळ उडाली होती. 

वेस्टर्न कमांडची गुप्त माहिती आणि ऑपरेशनची माहिती व्हिडिओवर टाकल्याबद्दल अद्याप मुख्यालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर काहीही बोलण्यास आर्मीच्या मुख्यालयातून नकार देण्यात आला आहे. 5-6 मे 2020 रोजी पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर एक मोठी घटना घडली होती. यानंतर 15 जून रोजी गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. ज्यामध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले होते. या युद्धात 40 हून अधिक चिनी सैनिक मारले गेले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव