शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ना पाक काही ऐकू शकणार, ना चीनला डेटा चोरता येणार, भारतीय लष्कराने तयार केली स्वतःची स्वतंत्र ‘संभव’ संपर्क यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 09:04 IST

भारतीय लष्कराची ही यंत्रणा ५ जी तंत्रज्ञानावर काम करील. लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाइल यंत्रणेला ‘संभव’ असे नाव दिले आहे.

नवी दिल्ली : लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतःची स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. ही यंत्रणा एवढी सुरक्षित आहे की, ना पाकिस्तान काही ऐकू शकणार आहे, ना चीन त्याचा डेटा चोरू शकणार. ही मोबाइल प्रणाली अनेक स्तरांवर सुरक्षित केली गेली आहे. यामुळे लष्कराचे संपूर्ण संभाषण सुरक्षित राहणार आहे.भारतीय लष्कराची ही यंत्रणा ५ जी तंत्रज्ञानावर काम करील. लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाइल यंत्रणेला ‘संभव’ असे नाव दिले आहे. १५ जानेवारीला लष्कर दिनानिमित्त पहिल्या टप्प्यात २५०० सेट लॉन्च केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३५ हजार संच तैनात केले जातील. 

‘ऑपरेशन सर्वशक्ती’ कसे राबविणार?या मोहिमेअंतर्गत जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पीर पंजाल पर्वतराजीच्या दोन्ही बाजूंनी लष्कर सक्रिय दहशतवाद्यांना लक्ष्य करील. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्स तसेच नगरकोटा-मुख्यालय असलेल्या व्हाइट नाइट कॉर्प्स संयुक्तरीत्या मोहीम राबवतील.जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ, विशेष कृती दल आणि गुप्तचर संस्था जम्मू-काश्मीरमध्ये विशेषतः राजौरी पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्याच्या पाकिस्तानच्या योजना हाणून पाडण्यासाठी समन्वय साधतील. पाकिस्तानसमर्थित दहशतवादी संघटनांनी दक्षिणेकडील पीर पंजाल पर्वतराजीमध्ये, विशेषतः राजौरी पूंछ सेक्टरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

दहशतवाद्यांचे हल्ले ‘सर्वशक्ती’ करणार फेलजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढवण्याच्या मनसुब्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ मोहीम ‘सर्पविनाश’च्या धर्तीवर असेल, जी २००३ मध्ये पीर पंजाल पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील त्याच भागात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

काय आहे ‘संभव’ प्रणालीची खासियत- भारतीय लष्कराचे संपर्क पूर्णपणे सुरक्षित राहतील.- ही यंत्रणा बहुस्तरीय सुरक्षा प्रणालीअंतर्गत गोपनीयपणे कार्य करील.- ही पूर्णपणे प्रत्यक्ष वेळेनुसार (रिअल टाइम) कार्य करील.- यामुळे लष्कराच्या कारवाया अधिक सक्षम होतील.

आपले सैनिक कुटुंब, जात आणि पंथ याच्यावर उठून फक्त राष्ट्राचा विचार करतात आणि ते त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे पार पाडतात कारण त्यांना माहीत आहे की, जर राष्ट्र सुरक्षित असेल तर सर्व काही सुरक्षित आहे.      - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान