शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
8
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
9
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
15
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
18
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
19
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
20
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान, तीन बंकर उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 10:14 IST

 नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

श्रीनगर - नियंत्रण रेषेवर  सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले असून, पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले आहेत. तसेच गोळीबारामध्ये पाकिस्तानचे 20 जवान ठार झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ परिसरातील मेंढर विभागात ही प्रत्युत्तरदाखल कारवाई केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अकारण गोळीबार करण्यात येत होता. भारतीय लष्कराने या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानचे फार नुकसान झाले. तसेच त्यांचे किमान पाच सैनिक ठार झाले. भारतीय सैनिकांच्या कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त झाली आहे, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील काही नागरिकही जखमी झाले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्या कारवाईत पाकिस्तानचे किमान 8 ते दहा रेंजर्सही ठार झाले होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान