शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान, तीन बंकर उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 10:14 IST

 नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

श्रीनगर - नियंत्रण रेषेवर  सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले असून, पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले आहेत. तसेच गोळीबारामध्ये पाकिस्तानचे 20 जवान ठार झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ परिसरातील मेंढर विभागात ही प्रत्युत्तरदाखल कारवाई केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अकारण गोळीबार करण्यात येत होता. भारतीय लष्कराने या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानचे फार नुकसान झाले. तसेच त्यांचे किमान पाच सैनिक ठार झाले. भारतीय सैनिकांच्या कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त झाली आहे, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील काही नागरिकही जखमी झाले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्या कारवाईत पाकिस्तानचे किमान 8 ते दहा रेंजर्सही ठार झाले होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान