शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भारताचे लष्करप्रमुख जनरल डायरसारखे, ज्येष्ठ इतिहासकारांची टीका

By admin | Updated: June 6, 2017 17:08 IST

काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. मात्र लष्कराने उघडलेल्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. मात्र लष्कराने उघडलेल्या मोहिमेविरोधात काही जणांनी आवाज उठवल्याने यावरून नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई जालियनवाला बाग हत्याकांडासारखी आहे, तर भारताचे लष्कप्रमुख बिपिन रावत यांचे वागणे जनरल डायरसारखे आहे, असे वक्तव्य करत इतिहासकार पार्थ चॅटर्जी यांनी वादाला तोंड फोडले आहे. 
 
1919 साली पंजाबमधीन जालियनवालाबाग येथे जमलेल्या नागरिकांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने बेछूट गोळीबार केला होता. यात शेकडो निष्पाप नागरिक मारले गेले होते. दरम्यान, भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये चालवलेल्या अभियानाची तुलना या हत्याकांडाशी केली आहे. काश्मिरी आंदोलकांविरोधात लष्कराकडून करण्यात येत असलेली कारवाई त्यावेळच्या ब्रिटिशांसारखीच असल्याचे चॅटर्जी यांनी म्हटले आहे.  
 ( कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले मेजर गोगोईंच्या कृतीचे समर्थन
दोन महिन्यांपूर्वी मेजर नितीन लितूल गोगोई यांनी लष्करावर दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव  करण्यासाठी एका काश्मिरी तरुणाला जीपला बांधून आपल्या तुकडीची सुटका करून घेतली होती. त्यानंतर  मेजर नितीन गोगोई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते. मात्र  यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती.  गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.  
 (कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान
दरम्यान चॅटर्जी यांच्या वक्तव्याबाबत लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी चॅटर्जी यांचे हे वक्तव्य धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तर भारतातच अशी माणसं असतील,  आपल्याला पाकिस्ताननसारख्या शत्रूची गरजच नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्नल व्ही.एन. थापर यांनी दिली आहे.