शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भारताचे लष्करप्रमुख जनरल डायरसारखे, ज्येष्ठ इतिहासकारांची टीका

By admin | Updated: June 6, 2017 17:08 IST

काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. मात्र लष्कराने उघडलेल्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. मात्र लष्कराने उघडलेल्या मोहिमेविरोधात काही जणांनी आवाज उठवल्याने यावरून नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई जालियनवाला बाग हत्याकांडासारखी आहे, तर भारताचे लष्कप्रमुख बिपिन रावत यांचे वागणे जनरल डायरसारखे आहे, असे वक्तव्य करत इतिहासकार पार्थ चॅटर्जी यांनी वादाला तोंड फोडले आहे. 
 
1919 साली पंजाबमधीन जालियनवालाबाग येथे जमलेल्या नागरिकांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने बेछूट गोळीबार केला होता. यात शेकडो निष्पाप नागरिक मारले गेले होते. दरम्यान, भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये चालवलेल्या अभियानाची तुलना या हत्याकांडाशी केली आहे. काश्मिरी आंदोलकांविरोधात लष्कराकडून करण्यात येत असलेली कारवाई त्यावेळच्या ब्रिटिशांसारखीच असल्याचे चॅटर्जी यांनी म्हटले आहे.  
 ( कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले मेजर गोगोईंच्या कृतीचे समर्थन
दोन महिन्यांपूर्वी मेजर नितीन लितूल गोगोई यांनी लष्करावर दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव  करण्यासाठी एका काश्मिरी तरुणाला जीपला बांधून आपल्या तुकडीची सुटका करून घेतली होती. त्यानंतर  मेजर नितीन गोगोई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते. मात्र  यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती.  गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.  
 (कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान
दरम्यान चॅटर्जी यांच्या वक्तव्याबाबत लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी चॅटर्जी यांचे हे वक्तव्य धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तर भारतातच अशी माणसं असतील,  आपल्याला पाकिस्ताननसारख्या शत्रूची गरजच नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्नल व्ही.एन. थापर यांनी दिली आहे.