शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

1965 ते 71च्या युद्धानंतर लष्कर मजबूत, कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार- जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 17:50 IST

डोकलाम मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी जोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली, दि. 9 - डोकलाम मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी जोख प्रत्युत्तर दिलं आहे. जेटली राज्यसभेत म्हणाले, भारतीय लष्कर देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकते. 1962च्या युद्धातून आम्हाला चांगला अनुभव मिळाला आहे. गेल्या काही दशकात भारतानं अनेक आव्हानांचा सामना केला आहे.1965  आणि 1971च्या युद्धामुळे भारताचं लष्कर आणखी ताकदवान झालं आहे. जेटली 1942च्या महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. आम्ही आजही शेजारील देशांच्या आव्हानाचा सामना करतोय. 1962च्या तुलनेत 1965 आणि 1971च्या युद्धामुळे भारतीय लष्कर मजबूत झालं आहे. 1962मध्ये भारताला चीनकडून लादण्यात आलेल्या युद्धाचा सामना करावा लागला होता. त्या युद्धात भारताचं मोठं नुकसान झालंय. परंतु 1965 आणि 1971मध्ये झालेल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारतानं विजय मिळवला होता, याचीही जेटलींनी आठवण करून दिली आहे.स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच आपण काही अडचणींचा सामना केला. शेजारील राष्ट्राची नेहमीच काश्मीरवर नजर होती. आजही देशाचा एक भाग आमच्यापासून वेगळा झाल्याचं आम्ही विसरू शकत नाही. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात समाविष्ट करावा, अशी अनेक भारतीयांची इच्छा आहे. देशाला प्रत्येक हिंसेपासून मुक्त करणं गरजेचं आहे. देश दहशतवाद आणि नक्षलवादासारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करतोय. राजीव गांधी आणि इंदिरा गांधींनी दहशतवादामुळेच स्वतःचा जीव गमावला आहे. सुरक्षा दलाचे जवान जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी मोठं योगदान देतायत, असंही जेटली म्हणाले आहेत. 

भारताने डोकलाममध्ये चिनी लष्कराला रस्ता बनवण्यापासून रोखल्याने हा वाद सुरु झाला होता. चीन बनवत असलेला रस्ता हा भारत, भूतान आणि चीनच्या संयुक्त सीमेवर आहे. भारताने येथील रस्त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा रस्ता बांधून पूर्ण झाल्यास या मार्गाच्या मदतीने चीनी सैन्य भारताचा पूर्वेकडील राज्यांशी असलेला संपर्क तोडू शकतो अशी भारताला भीती आहे.