शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

चीन-पाकला एकत्रितरित्या तोंड देण्यास भारत सज्ज; आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 13:49 IST

स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

ठळक मुद्देचीनसोबतच्या तणावामुळे भारताचा मोठा निर्णयभारतीय लष्कराला आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार५० हजार कोटींचा शस्त्रसाठा विकत घेणार भारतीय लष्कर

नवी दिल्लीचीनच्या सीमेवरील कुरापती लक्षात घेता भारताने महत्वाचं पाऊल उचललं आहे. भारतीय सुरक्षा दलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा युद्धसाठा करुन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नव्या अधिकारांमुळे आणि आणीबाणीच्या काळातील खरेदीच्या अधिकारांचा वापर करुन येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय लष्कर तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. 

स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

परकीय शक्तींकडून देशावर हल्ला झाल्यास १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा तयार ठेवण्याची परवानगी सुरक्षा दलांना होती. त्यात वाढ करुन आता १५ दिवसांचा शस्त्रसाठा सुरक्षा दलाला ठेवता येणार आहे. "शत्रू देशासोबत लढाईचा प्रसंग उद्भवल्यास १५ दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी आवश्यक तो शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे", अशी माहिती सरकारी सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. 

चीन आणि पाकिस्तानला एकत्रितरित्या सामोरं जाण्यासाठी भारताची तयारीभारत सध्या चीनच्या सीमेवरील कुरापतींचा सामना करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून सुरू असलेली घुसखोरीही भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख बिपिन रावत यांनीही याआधी अनेकदा चीन आणि पाकिस्तानसोबत एकत्रितरित्या तोंड द्यावं लागण्याची तयारी करायला हवी असं म्हटलं आहे. चीनसोबतच्या तणावामुळे भारताने अनेक सुरक्षा करार केले आहेत. याशिवाय अनेक स्वदेशी मिसाइलची चाचणी केली जात आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तान