शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांची ट्विटरवर यथेच्छ चेष्टा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 17:23 IST

ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह झालेल्या देशप्रेमी भारतीयांनी मेजर जनरल असिफ गफुर यांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देभारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे.दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे.भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000' च्या 12 लढाऊ विमानांची हा हल्ला केला.

पुणे :  ‘हाऊ इज दी खौफ’, ‘‘लार्जेस्ट नंबर आॅफ सोल्जर्स सरेंडरींग’ ये वर्ल्ड रेकॉर्ड बना दिया, वो १९७१ था. अब २०१९ है. अब उस से भी बडा रेकॉर्ड बनाना हे क्या’’, ‘इंडिया के प्लेन घुस रहे थे तब पाकिस्तान सौदी अरेबिया से फेके हुए चवन्नींया इकठ्ठा कर रहा था,’ या सारख्या अनेक खोचक प्रतिक्रिया पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफुर यांना ऐकवण्यात आल्या आहेत. ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह झालेल्या देशप्रेमी भारतीयांनी मेजर जनरल असिफ गफुर यांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून येत आहे. 

पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफुर यांनी ट्विटरवरुन भारतीय वायुसेनेच्या हल्ल्याची माहिती आज सकाळी दिली. मुझफराबाद सेक्टर मधून भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठल्याही मालमत्तेचे नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानी वैमानिकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारतीय विमानांनी पळ काढला, अशा आशयाची पोस्ट आणि फोटो असिफ गफुर यांनी शेअर केले. त्यावर भारतीय ट्विटरवर युजर्स तुटून पडले आहेत. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नागरिक करत असल्याने असिफ गफुर यांच्या अकाऊंटवरही भारत-पाक ट्विटरवर युद्ध रंगले आहे. मात्र तिथेही भारतीयांचाच विजय होत असल्याचे दिसत आहे. 

‘‘फिर वही बात, कारगिर हो या कारगल ठोका तो हम ने था’’, असे अनीस खान लोधीने म्हटले आहे. त्याची खिल्ली उडवताना बॉम्बे डकने म्हटले आहे, की ‘कब तक धोके मे जिओगे भाई. एक काम करो. पहले टायपिंग और इंग्लिश सुधारो.’ अली-बिलाल म्हणतो, ‘‘सर डोन्ट लेट देम गो बॅक अलाईव्ह (भारतीयांना जीवंत परत जाऊ देऊ नका).’’ त्याला गिरीश भारद्वाजने उत्तर दिले आहे, ‘‘आम्ही बॉम्ब टाकले आणि सुरक्षितपणे परतही आलो. त्यावेळी तुमची लढाऊ विमाने टोमॅटो खरेदी करण्यात व्यस्त असतील.’’ महत्त्वाचे साहित्य टाकून भारतीय विमानांनी पळ काढल्याचे सांगत गफुर यांनी यंत्राचा फोटो ट्विट केला आहे. त्याची खिल्ली उडवताना अंकुर ठाकूर म्हणतो, ‘‘सनी देओलने हाताने उपसून काढलेल्या हात पंपाचा फोटो तुम्ही पोस्ट केला आहे.’’ तर गब्बरने चेष्टा करताना म्हटले आहे, ‘‘तुमच्या विमानांच्या आधी तुमचे फोटोग्राफर घटनास्थळी पोचलेले दिसतात.’’ 

‘‘४५ फौजी मारे है ना, तुम्हारे घर मे घुस के. पुलवामा इतनी जल्दी भुल गय’’ असा प्रश्न खलील अहमद शफीने विचारला आहे. त्याची टर उडवताना अवधेश चौधरी म्हणतो, ‘‘हर जंग हारे हो. अपने अब्बा से पुछ. तुम कितने लोगो ने सरेंडर किया था इंडियन आर्मी के आगे?’’ थँक यू इंडियन एअर फोर्स या नावाने टिष्ट्वटर हँडल असलेल्या भारतीयाने उत्तर दिले आहे, ‘‘हर बार मार खाते हो. पिटने के बाद चिल्लाते हो, हम जीत गये. बेशरम पाकिस्तानीयो.’’ ‘भारतीय विमाने पाकिस्तानी हद्दीत घुसल्याचे तरी मान्य केलेत ना. आता हळू हळू बाकी सगळेही मान्य कराल,’ असा टोमणा तथागत यांनी लगावला आहे.

भारतीय राजकारणाचेही पडसाद काही कॉमेंट्समधून उमटले आहेत. भारतीय विमानांनी एलओके ओलांडून हल्ला केल्याचे सांगितले, त्याचे फोटो प्रकाशित केले, या बद्दल असिफ गफुर यांचे आभार मानले आहेत. ‘बरे झाले, आता केजरीवाल आणि राहुल गांधींना हे दाखवता येईल’, असी खोचक टीप्पणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गफुर यांचे हे अधिकृत ट्विटर अकाऊंट असल्याने पाकिस्तानातल्या प्रमुख दैनिकांनी त्याचा हवाला दिला आहे. सोबत त्याची छायाचित्रे स्वत:च्या संकेतस्थळांवरुन प्रकाशित केली असल्याने भारतीयांनी केलेली चेष्टादेखील त्या सोबत जगभरच्या वाचकांपर्यंत पोचली आहे.

दरम्यान, भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळापास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे. पाकिस्तानला हल्ला करण्यात येणार आहे, याचा सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या  विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान