शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

...तर भारत पाकिस्तानला धडा शिकवेल - अमेरिका

By admin | Updated: May 24, 2017 11:55 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याबरोबरच अन्य लष्करी पर्यायांवरही भारत गांर्भीयाने विचार करत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. 24 - आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याबरोबरच अन्य लष्करी पर्यायांवरही भारत गांर्भीयाने विचार करत आहे अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी अमेरिकन सिनेटच्या सदस्यांना दिली. सिनेटच्या लष्करी सेवा समितीसमोर बोलताना विनसेंट स्टिवॉर्ट यांनी हा इशारा दिला. 
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला एकाकी पाडण्याबरोबरच घुसखोरीला प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारत अन्य लष्करी पर्यायांवरही विचार करतोय असे विनसेंट म्हणाले. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी चौक्यांवर केलेल्या कारवाईचा व्हिडीओ भारतीय लष्कराने सार्वजनिक केल्यानंतर अमेरिकच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विनसेंट यांनी हे विधान केले. 
 
जमीन तसेच समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारताकडून आपल्या लष्कराच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत-पाकिस्तानमधील व्दिपक्षीय संबंध पार बिघडून गेले आहेत असे विनसेंट म्हणाले. भारतावर दहशतवादी हल्ल्याचा धोका, काश्मीर खो-यातील हिंसाचार यामुळे हे संबंध अधिक बिघडू शकतात असे ते म्हणाले. 
 
भारताने 9 मे रोजी सर्जिकल स्ट्राईकनंतरची दुसरी मोठी कारवाई करताना पाकिस्तानला जबर दणका दिला. गोळीला गोळीने उत्तर देण्याचे आपले धोरण बाजूला ठेवत भारतीय लष्कराने गोळीला तोफगोळयाच्या वर्षावाने उत्तर दिले. घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी सैन्यावर जरब बसवण्यासाठी लष्कराने घातक हत्याराचा उपयोग केला. एकापाठोपाठ एक स्फोट घडवून
पाकिस्तानी चौक्या आणि बंकर नष्ट केले. 
 
यापूर्वी 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताच्या पॅरा कमांडोंनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते तसेच त्यांचे तळही नष्ट केले होते. त्यानंतरही ही मोठी कारवाई समजली जात आहे. 1 मे रोजी पाकिस्तानी कमांडोंनी गस्तीवर असणा-या भारतीय जवानांवर हल्ला करुन त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. पाकिस्तानच्या त्या नापाक हरकतीचा हा बदला आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्यकता नाही. भारतात राहूनही पाकिस्तानला नेस्तनाबूत करता येते हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले. 
 
काय केले भारताने
सीमेवर कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या आहेत. मेजर जनरले अशोक नरुला यांनी प्रसारमाध्यमांना ही  माहिती देताना कारवाईचा व्हिडीओही सार्वजनिक केला.