शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भारत जगावर राज्य करणार

By admin | Updated: April 20, 2016 03:07 IST

सध्याचे २१ वे शतक ज्ञानाचे युग असून यात भारत जगावर राज्य करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केला.

कटरा (जम्मू-काश्मीर) : सध्याचे २१ वे शतक ज्ञानाचे युग असून यात भारत जगावर राज्य करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केला.भारतात ३५ वर्षांखालील ८० कोटी युवक असून प्रत्येक युवकाचे स्वप्न हे देशाच्या प्रगतीची कहाणी ठरावे. २१ वे शतक हे ज्ञानाचे शतक असून त्याचे भारत नेतृत्व करेल. त्यासाठी ज्ञान हीच ऊर्जा असून ती भारताकडे आहे. गरिबांसाठी काही तरी करण्याची प्रतिज्ञा करू या. कारण गरीब वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या योगदानातून हे विद्यापीठ उभे ठाकले आहे. लाखो यात्रेकरू खूप दूरवरून आले असतील. देशातील अन्य विद्यापीठे करदात्यांच्या(मातापित्यांनी दिलेले पैसे) पैशावर चालत असताना हे विद्यापीठ वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लाखो गरीब यात्रेकरूंच्या पैशावर चालते हेच या विद्यापीठाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.रुग्णालयाचे उद्घाटन...कटरालगतच्या काकरॅल येथे श्री मातादेवी नारायणा सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे मोदींनी उद्घाटन केले. श्री मातादेवी देवस्थान मंडळाने ३०० कोटी रुपये खर्चून हे २३० खाटांचे रुग्णालय उभारले आहे. तेथे कॉर्डिओलॉजी, कॉर्डिओ-थोरॅसीस सर्जरीसह २० पेक्षा जास्त औषध आणि शस्त्रक्रिया शाखा आहेत. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला राज्यपाल एन.एन. व्होरा, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उपमुख्यमंत्री निर्मलसिंग, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग उपस्थित होते.दीपाने नाव सार्थ केले...रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या त्रिपुराच्या दीपा करमाकर या पहिल्या भारतीय महिला जिम्नॅस्टबाबत मोदींनी गौरवोद्गार काढले. दीपाने देशाची मान अभिमानाने उंचावताना स्वत:चे नाव सार्थ ठरविले आहे. निर्धारातून तिने हे यश मिळविले आहे. संसाधनांच्या कमतरतेचा अडसर तिने प्रगतीच्या आड येऊ दिला नाही, असे ते दीक्षांत समारंभात म्हणाले. (वृत्तसंस्था)