शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

भारत 1962 च्या युद्धातील चूक पुन्हा करणार नाही, चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 08:42 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे

ठळक मुद्देचीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होताडोकलाममधून भारताने माघार घेतली नाही तर नंतर स्वत:ला दोष देण्याखेरिज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नसेल - चीनकेंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास पुर्णपणे सज्ज आहे असं सांगितलं आहे

नवी दिल्ली, दि. 10 - डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अजूनही कायम असून चीनची युद्धाची धमकी देण्याची खोड काही केल्या जाताना दिसत नाही आहे. मंगळवारी चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती. इकडे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे. अरुण जेटली यांनी आपल्या बोलण्यात डोकलामचा उल्लेख केला नसला, तरी चीनकडून येणा-या धमक्यांच्या पार्श्वभुमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. 

तर स्वत:ला दोष देईल भारत चीनी वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, डोकलाममधून भारताने माघार घेतली नाही तर नंतर स्वत:ला दोष देण्याखेरिज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नसेल. 'दोन्ही देशांमधील लष्करामध्ये युद्दाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कोणताही मार्ग काढण्यास जागा नसेल अशी वाटचाल सध्या सुरु आहे. वाद सुरु होऊन सात आठवडे होत आहेत, आणि शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व मार्गही बंद होताना दिसत आहेत', असंही संपादकीयमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

भारताला वारंवार समज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. 'ज्यांच्याकडे ऐकण्यासाठी कान आणि पाहण्यासाठी डोळे आहेत त्यांच्याकडे हा संदेश पोहोचायला हवा होता. पण भारत शुद्धीत येण्यास नकार देत आहे, आणि आपलं सैन्यही मागे हटवत नाही आहे', असंही लिहिलं गेलं आहे. 

'1962 मधून घेतला धडा'चीनकडून सतत मिळणा-या युद्धाची धमकी मिळत असताना दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास पुर्णपणे सज्ज आहे असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपण 1962 च्या युद्धातून धडा घेतला असल्याचा उल्लेखही केला. 

'सैनिकांवर पुर्ण विश्वास'त्यांनी सांगितलं की 'सशस्त्र सेनेला अजून सक्षम बनवण्याची गरज असल्याचा धडा भारतने चीनसोबत झालेल्या 1962 मधील युद्धातून घेतला आहे'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'काही आव्हानं आजही आपल्यासमोर उभी आहेत याच्याशी मी सहमत आहे. काही लोकांची आपल्या सार्वभौमत्व आणि एकाग्रतेवर नजर आहे. मात्र आपणे वीर जवान देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये सक्षम आहेत यावर पुर्ण विश्वास आहे. मग येणारं आव्हान पुर्वेकडून येणार असो अथवा पश्चिमेकडून'. 

याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.