शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भारत 1962 च्या युद्धातील चूक पुन्हा करणार नाही, चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 08:42 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे

ठळक मुद्देचीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होताडोकलाममधून भारताने माघार घेतली नाही तर नंतर स्वत:ला दोष देण्याखेरिज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नसेल - चीनकेंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास पुर्णपणे सज्ज आहे असं सांगितलं आहे

नवी दिल्ली, दि. 10 - डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अजूनही कायम असून चीनची युद्धाची धमकी देण्याची खोड काही केल्या जाताना दिसत नाही आहे. मंगळवारी चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती. इकडे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे. अरुण जेटली यांनी आपल्या बोलण्यात डोकलामचा उल्लेख केला नसला, तरी चीनकडून येणा-या धमक्यांच्या पार्श्वभुमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. 

तर स्वत:ला दोष देईल भारत चीनी वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, डोकलाममधून भारताने माघार घेतली नाही तर नंतर स्वत:ला दोष देण्याखेरिज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नसेल. 'दोन्ही देशांमधील लष्करामध्ये युद्दाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. कोणताही मार्ग काढण्यास जागा नसेल अशी वाटचाल सध्या सुरु आहे. वाद सुरु होऊन सात आठवडे होत आहेत, आणि शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व मार्गही बंद होताना दिसत आहेत', असंही संपादकीयमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

भारताला वारंवार समज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. 'ज्यांच्याकडे ऐकण्यासाठी कान आणि पाहण्यासाठी डोळे आहेत त्यांच्याकडे हा संदेश पोहोचायला हवा होता. पण भारत शुद्धीत येण्यास नकार देत आहे, आणि आपलं सैन्यही मागे हटवत नाही आहे', असंही लिहिलं गेलं आहे. 

'1962 मधून घेतला धडा'चीनकडून सतत मिळणा-या युद्धाची धमकी मिळत असताना दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास पुर्णपणे सज्ज आहे असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपण 1962 च्या युद्धातून धडा घेतला असल्याचा उल्लेखही केला. 

'सैनिकांवर पुर्ण विश्वास'त्यांनी सांगितलं की 'सशस्त्र सेनेला अजून सक्षम बनवण्याची गरज असल्याचा धडा भारतने चीनसोबत झालेल्या 1962 मधील युद्धातून घेतला आहे'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'काही आव्हानं आजही आपल्यासमोर उभी आहेत याच्याशी मी सहमत आहे. काही लोकांची आपल्या सार्वभौमत्व आणि एकाग्रतेवर नजर आहे. मात्र आपणे वीर जवान देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये सक्षम आहेत यावर पुर्ण विश्वास आहे. मग येणारं आव्हान पुर्वेकडून येणार असो अथवा पश्चिमेकडून'. 

याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.