शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 23, 2021 10:20 IST

चीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

ठळक मुद्देचीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्यचर्चेतून तोडगा निघण्याचा सिंह यांचा विश्वास

जोवर चीन सीमेवर आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही, असं रोखठोक उत्तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. यावेळी त्यांनी भारत-चीनदरम्यान असलेल्या वादावर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो असा विश्वासही व्यक्त केला. भारत आपल्या सीमाक्षेत्रात तेजीनं पायाभूत सुविधांचा विकास करत आहे आणि चीननं काही योजनांवर आक्षेपही घेतला असल्याचं सिंह म्हणाले. "जोवर चीन आपल्या सैनिकांची संख्या कमी करत नाही. तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू करणार नाही," असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. "सध्या सुरू असलेल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कोणती वेळेची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही, यासाठी तुम्ही वेळेची मर्यादा ठरवू शकत नाही. आम्हाला चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अरूणाचल प्रदेशात चीननं गाव वसवल्याच्या वृत्तावरही भाष्य केलं. "हा परिसर सीमेच्या अतिशय जवळ आहे आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा अनेक वर्षांच्या कालावधीत विकसित करण्यात आल्या आहेत," असंही ते म्हणाले. भारत आणि चीन या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध गेल्या चार दशकांच्या किमान स्तरावर आहेत आणि चीननं भारताच्या विश्वासाला तडा दिला आहे का असा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारण्यात आला. "चीननं भारताचा विश्वास तोडला आहे यात कोणतीही शंका नाही," असं उत्तर सिंह यांनी यावेळी दिलं. यावेळी त्यांनी सैन्य स्तरावर चर्चेच्या पुढील फेरीता संदर्भ देताना चीननं अलिकडेच १९ जानेवारी रोजीचा चर्चेचा प्रस्ताव ठेवला असल्याचं सांगितलं. "चर्चेच्या एका दिवसांपूर्वीच आम्हाला याची माहिती मिळाली होती. म्हणूनच आम्ही ही चर्चेची फेरी २३ किंवा २४ जानेवारी रोजी पुन्हा निश्चित करण्यास सांगितलं. भारत कायमच चर्चेसाठी तयार असतो," असंही सिंह म्हणाले.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनBorderसीमारेषाinterviewमुलाखत