शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तर भारतच आधी टाकेल पाकिस्तानवर अणुबॉम्ब

By admin | Updated: March 22, 2017 07:50 IST

युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला अणु हल्ला करण्याची संधी न देता भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 22 - युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला अणु हल्ला करण्याची संधी न देता भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल असा दावा करण्यात आला आहे. वॉशिंग्टनमध्ये 'कार्नेगी इंटरनॅशनल न्यूक्लिअर पॉलिसी कॉन्फ्रेन्स'दरम्यान हा दावा करण्यात आला. दक्षिण आशियातील आण्विक क्षेत्रातील तज्ञ विपुल नारंग यांनी हा दावा केला. 
 
अणु हल्ला न करण्याच्या धोरणामध्ये बदल करून भारतच आधी पाकिस्तानवर हल्ला करेल असा त्यांचा दावा आहे. नारंग हे मेसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये दक्षिण आशियातील आण्विक धोरणाविषयीचे तज्ञ आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तशी परिस्थिती उद्भवली तर भारत पाकिस्तानला कोणतीही संधी देणार नाही. पहिले हल्ला न करण्याचं आपलं धोरण बाजुला ठेवून आधी भारतच पाकिस्तानवर अणु हल्ला करेल असं ते म्हणाले.  
 
अणु हल्ला करताना पाकिस्तानच्या अणु केंद्रांना भारताकडून लक्ष्य केंद्र केलं जाईल. त्यामुळे भारताच्या कोणत्याही शहरावर अणु हल्ल्याचा धोका राहणार नाही आणि युद्धपरिस्थितीत भारताचं पारडं वर राहिल. पाकिस्तानला भारत संधी देणार नाही याचे पुरावे दिवसेंदिवस वाढत आहेत असं नारंग म्हणाले. आपल्या विधानाचा पुरावा म्हणून नारंग यांनी माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या  'चॉइसेस : इनसाइड द मेकिंग ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी'चं उदाहरणही दिलं.  
 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काश्मीरच्या उरी येथील भारतीय लष्‍कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता यामध्ये अनेक भारतीय जवान शहिद झाले होते.  त्यानंतर भारताकडून लष्कराने पहिल्यांदाच लाइन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये (POK) घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उध्वस्त केले. या कारवाईत जवळपास 38 दहशतवादी ठार मारण्यात आले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.