शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

'हा नवीन भारत आहे, ज्याठिकाणी आडनावाला नाही तर तरूणांच्या क्षमतेला महत्व आहे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:37 IST

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, हा नवा भारत आहे. यात आडनावाला महत्व नाही तर आपलं नाव बनविण्याची क्षमता ठेवणार तरूण क्षमता ठेवतात. भारतात अनेक गोष्टी बदलत आहेत. यात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. लोकांमध्ये आणि प्रशासनात संवाद असणे गरजेचे आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे.

मनोरमाच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहमती घेण्याची आवश्यकता नाही पण सार्वजनिक जीवनात वावरताना विविध विचारधारांच्या माणसांचे ऐकले पाहिजे. आम्ही अनेक गोष्टी बदलल्या आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून सुरु होणारी अर्थव्यवस्था नव्या भारताच्या दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती. त्यांना अनेकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तरूणांचे यश मोठं शहर, मोठी संस्थाने अथवा मोठ्या परिवारातून आला असेल यावर निर्भर होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. तरूणांसाठी विविध दारे उघडली आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

तसेच भारत सध्या अशा क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे ज्याठिकाणी आम्हाला याआधी पोहचणं कठीण जात होते. स्टार्टअप असो वा क्रीडा. लहान लहान शहरातील युवाही जे कोणत्याही वशिल्याशिवाय पुढे जात आहे. ज्यांच्याकडे स्वप्न आहेत त्यांना उडण्याचे बळ मिळत आहेत. ते त्यांच्या कतृत्वावर यशाचं शिखर गाठत आहे. भारताचं नाव उंचावत आहेत. हे नवीन भारताचं यश आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

भारत हा एकमेव देश आहे ज्याठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात. मग आपण या भाषांचा उपयोग करत एकता आणण्याचं काम करू शकत नाही का? वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम मीडिया करू शकत नाही का? हे कठीण नाही जितकं दाखविले जाते. आज लोक म्हणतात की, आम्ही स्वच्छ भारत बनविणार, आम्ही भारताला भ्रष्टाचारमुक्त बनविणार, आम्ही सुशासन आणणार, हे सगळं शक्य झालं कारण यासाठी इच्छाशक्ती हवी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी