शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

'हा नवीन भारत आहे, ज्याठिकाणी आडनावाला नाही तर तरूणांच्या क्षमतेला महत्व आहे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:37 IST

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, हा नवा भारत आहे. यात आडनावाला महत्व नाही तर आपलं नाव बनविण्याची क्षमता ठेवणार तरूण क्षमता ठेवतात. भारतात अनेक गोष्टी बदलत आहेत. यात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. लोकांमध्ये आणि प्रशासनात संवाद असणे गरजेचे आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे.

मनोरमाच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहमती घेण्याची आवश्यकता नाही पण सार्वजनिक जीवनात वावरताना विविध विचारधारांच्या माणसांचे ऐकले पाहिजे. आम्ही अनेक गोष्टी बदलल्या आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून सुरु होणारी अर्थव्यवस्था नव्या भारताच्या दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती. त्यांना अनेकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तरूणांचे यश मोठं शहर, मोठी संस्थाने अथवा मोठ्या परिवारातून आला असेल यावर निर्भर होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. तरूणांसाठी विविध दारे उघडली आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

तसेच भारत सध्या अशा क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे ज्याठिकाणी आम्हाला याआधी पोहचणं कठीण जात होते. स्टार्टअप असो वा क्रीडा. लहान लहान शहरातील युवाही जे कोणत्याही वशिल्याशिवाय पुढे जात आहे. ज्यांच्याकडे स्वप्न आहेत त्यांना उडण्याचे बळ मिळत आहेत. ते त्यांच्या कतृत्वावर यशाचं शिखर गाठत आहे. भारताचं नाव उंचावत आहेत. हे नवीन भारताचं यश आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

भारत हा एकमेव देश आहे ज्याठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात. मग आपण या भाषांचा उपयोग करत एकता आणण्याचं काम करू शकत नाही का? वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम मीडिया करू शकत नाही का? हे कठीण नाही जितकं दाखविले जाते. आज लोक म्हणतात की, आम्ही स्वच्छ भारत बनविणार, आम्ही भारताला भ्रष्टाचारमुक्त बनविणार, आम्ही सुशासन आणणार, हे सगळं शक्य झालं कारण यासाठी इच्छाशक्ती हवी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी