शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

चिनी पाणबुडीच्या श्रीलंकेतील मुक्कामामुळे भारत सतर्क

By admin | Updated: September 28, 2014 13:01 IST

लडाख येथे घुसखोरी करुन भारताला आव्हान देणा-या चीनने आता समुद्री मार्गाद्वारेही भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - लडाख येथे घुसखोरी करुन भारताला आव्हान देणा-या चीनने आता समुद्री मार्गाद्वारेही भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या श्रीलंकेदौ-यापूर्वी तब्बल नऊ दिवस चीनच्या नौदलाची पाणबुडी श्रीलंकेतील कोलंबो येथे मुक्कामाला असल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली आहे. हा भाग भारताच्या दृष्टीने अति संवेदनशील भाग आहे. 
बंगालच्या उपसागरापासून ते हिंद महासागरापर्यंत चिनी नौदलाच्या पाणबुड्यांचा नेहमीच वावर असतो व भारतीय नौदलानेही या पाणबुड्यांना नेहमीच ट्रॅक केले आहे. मात्र ७ ते १४ सप्टेंबर दरम्यान चिनी नौदलाची साँग क्लास ही डिझेल - इलेक्ट्रीक पाणबुडी श्रीलंकेतील कोलंबो येथील आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल येथे मुक्काम ठोकून होती. या घटनेने भारतीय नौदल यंत्रणा चक्रावून गेली होती. ज्या भागामध्ये चिनी पाणबुडी होती तो भाग भारताच्या दृष्टीने अति संवेदनशील विभाग आहे. या भागात आत्तापर्यंत कधीही चिनी पाणबुड्या आलेल्या नव्हत्या. विशेष म्हणजे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या श्रीलंका दौ-याच्या वेळीच ही पाणबुडी कोलंबोत ठाण मांडून होती. 
चीनचे नौदल ग्रीन वॉटर फोर्सपासून  ब्लू वॉटर फोर्समध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहे. यानुसार चिनी नौदल केवळ चीनच्या सागरी किना-यांचेच नव्हे तर खोल समुद्रातही स्वतःची अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील नवनियुक्त मोदी सरकारचे सागरी व भू सीमा सुरक्षेविषयक धोरण काय आहे हे तपासण्यासाठी चीनने या कुरापाती सुरु केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चीनचे पूर्व आफ्रिका, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार व कंबोडियाशी सागरी संबंध असून सागरी रस्त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठीच चिनी नौदलाने आता हिंद महासागरात आक्रमक धोरण राबवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हिंदी महासागरातील चिनी पाणबुडीने मुक्काम ठोकल्याने भारताच्या नौदल यंत्रणाही सतर्क झाल्या असून चिनी पाणबुड्या व नौदलाच्या वावरावर भारताची करडी नजर आहे. चीनला उत्तर देण्यासाठी नौदल सक्षम असल्याचे नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. तर ही पाणबुडी सागरी चाच्यांवर कारवाईसाठी जात होती. इंधन भरण्यासाठी ही पाणबुडी कोलंबोतील सागरी किना-यावर थांबली होती असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे.