शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

भारतातच स्वातंत्र्य हवे आहे!

By admin | Updated: March 4, 2016 03:44 IST

भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी

नवी दिल्ली : भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची गुरुवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर विद्यापीठ परिसरात बोलताना त्याने सरकारला लक्ष्य केले. कन्हैया म्हणाला की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझे मतभेद आहेत पण, त्यांनी स्मृती इराणींच्या जेएनयू प्रकरणावरील भाषणानंतर सत्यमेव जयते असे जे व्टिट केले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. कारण, हे संविधानातील शब्द आहेत. भारतातील संविधान आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचेही तो म्हणाला. आम्ही अभाविपला शत्रू समजत नाही, कारण आमचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास आहे. आम्ही अभाविपला विरोधी पक्षासारखेच पाहतो. माझी अटक म्हणजे एक सुनियोजित कट असल्याचेही तो म्हणाला. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर मी बोलणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. यावेळी त्याने सरकारवर चौफेर टोलेबाजी केली, तो म्हणाला, मोदीजी मन की बात करतात, पण दुसऱ्यांचे ऐकत नाहीत. जेएनयूविरोधात जीही सत्ता उभी राहिली त्याला आम्ही धडा शिकवला आहे, असे सांगून तो म्हणाला की, लढणारे जबादार नाहीत लढवणारे जबाबदार आहेत. देशातील सरकार हे लोकविरोधी सरकार आहे. आम्हाला भ्रष्टाचारपासून स्वातंत्र्य हवंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे? असा सवालही त्याने केला.