शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भारतातच स्वातंत्र्य हवे आहे!

By admin | Updated: March 4, 2016 03:44 IST

भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी

नवी दिल्ली : भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची गुरुवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर विद्यापीठ परिसरात बोलताना त्याने सरकारला लक्ष्य केले. कन्हैया म्हणाला की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझे मतभेद आहेत पण, त्यांनी स्मृती इराणींच्या जेएनयू प्रकरणावरील भाषणानंतर सत्यमेव जयते असे जे व्टिट केले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. कारण, हे संविधानातील शब्द आहेत. भारतातील संविधान आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचेही तो म्हणाला. आम्ही अभाविपला शत्रू समजत नाही, कारण आमचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास आहे. आम्ही अभाविपला विरोधी पक्षासारखेच पाहतो. माझी अटक म्हणजे एक सुनियोजित कट असल्याचेही तो म्हणाला. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर मी बोलणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. यावेळी त्याने सरकारवर चौफेर टोलेबाजी केली, तो म्हणाला, मोदीजी मन की बात करतात, पण दुसऱ्यांचे ऐकत नाहीत. जेएनयूविरोधात जीही सत्ता उभी राहिली त्याला आम्ही धडा शिकवला आहे, असे सांगून तो म्हणाला की, लढणारे जबादार नाहीत लढवणारे जबाबदार आहेत. देशातील सरकार हे लोकविरोधी सरकार आहे. आम्हाला भ्रष्टाचारपासून स्वातंत्र्य हवंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे? असा सवालही त्याने केला.