शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारत स्वत:चे एआय मॉडेल विकसित करणार; अर्ध्या किमतीत मिळेल सेवा, भारतीय भाषांना असेल प्राधान्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:00 IST

भारताने आपल्या एआय मसुद्याच्या पुढील टप्प्याची घोषणा गुरुवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चॅटजीपीटी व तत्सम एआय तंत्रज्ञानाला टक्कर देण्यासाठी आगामी  काही महिन्यांत भारत आपले स्वत:चे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारभूत मॉडेल विकसित करणार आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञानमंत्री (आयटी) अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी केले. 

स्टार्टअप आणि संशोधकांसाठी ‘कॉमन कॉम्प्युटिंग’ सुविधेंतर्गत १८,६९३ ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (जीपीयू) तैनात करण्याची घोषणाही वैष्णव यांनी केली आहे. भारताने आपल्या एआय मसुद्याच्या पुढील टप्प्याची घोषणा गुरुवारी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. वैष्णव यांनी सांगितले की, भारतास जागतिक एआय केंद्र म्हणून अग्रेसर करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी एक एआय सुरक्षा संस्था सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानास सर्वांसाठी सुलभ बनविणे, हा आपल्या पंतप्रधानांचा विचार आहे. 

वैष्णव यांनी सांगितले की, या माध्यमातून भारत चॅटजीपीटी, डीपसीक आर १ आणि अन्य एआय मॉडेलला टक्कर देण्याची तयारी करत आहे. 

भारतीय भाषांना असेल प्राधान्य, वापरायला सोपेभारतीय संदर्भ, भारतीय भाषा आणि संस्कृती यास प्राधान्य असेल. यातील आकडे आमच्या देशासाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे असतील. आमची कॉम्प्युटिंग सुविधा जगात सर्वाधिक स्वस्त असेल. त्याचा ४० टक्के खर्च सरकार उचलेल. त्यानंतर ही सुविधा १ डॉलर प्रति जीपीयू तास या कमीत कमी दराने सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल. आगामी ८ ते १० महिन्यांच्या आत हे मॉडेल बनविले जाईल.

चीनच्या डीपसीकला भारतीय सर्व्हरवर केले जाईल होस्ट; पण पाळावे लागतील नियम‘डीपसीक’ संबंधीच्या चिंतांच्या मुद्द्यावर वैष्णव यांनी म्हटले की, यास भारतीय सर्व्हरवर होस्ट केले जाईल. त्याचे नियम त्यांना पाळावे लागतील. चिनी कंपनी डीपसीकने आपले आर१ हे एआय मॉडेल नुकतेच जारी केले आहे. ‘आर१’ने अमेरिकी कंपन्यांच्या प्रभावास आव्हान दिले आहे.  या पार्श्वभूमीवर भारताची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, भारताच्या जीपीयू बोलीदात्यांत जियो प्लॅटफॉर्म्स, सीएमएस कॉम्प्युटर, टाटा कम्युनिकेशन्स, ई 2 ई नेटवर्क, योटा डेटा सर्व्हिसेस आणि इतरांचा समावेश आहे. याशिवाय ८ प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स