शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

Coronavirus: आता देशांतर्गत विमान उड्डाणंही बंद; कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 18:23 IST

Coronavirus कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय; उद्या रात्रीपासून अंमलबजावणी

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी (उद्या) रात्री १२ वाजल्यापासून देशातील हवाई उड्डाणं बंद होतील. त्यामुळे उद्या रात्री १२ च्या आधी विमानं विमानतळांवर उतरतील, अशा प्रकारची योजना विमान कंपन्यांना आखावी लागेल. सरकारनं याआधीच रेल्वे वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशात दररोज जवळपास ६५०० विमानांची उड्डाणं होतात. ही उड्डाणं देशांतर्गत स्वरुपाची असतात. यामधून वर्षाकाठी १४४.१७ मिलियन प्रवासी प्रवास करतात. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशांतर्गत हवाई उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशात आतापर्यंत कोरोनाचे चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० नं वाढलाय. दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. तर उत्तर प्रदेशमधल्या १६ जिल्ह्यांमध्ये २५ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. महाराष्ट्रातही जमावबंदीपाठोपाठ संचारबंदी लागू करण्यात आलीय. देशातील प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कालच मोदी सरकारनं घेतला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द केल्या आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद आहेत. सध्या केवळ मालगाड्या सुरू आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच लोकल गाड्यादेखील बंद केल्या गेल्या आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या