शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

दहशतवादग्रस्त देशांमध्ये भारत सहावा

By admin | Updated: November 19, 2014 11:31 IST

जगभरातील दहशतवादग्रस्त देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागला असून भारतात २०१३ मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या ६२४ घटना घडल्या असून यामध्ये ४०४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. १९ - जगभरातील दहशतवादग्रस्त देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागला असून भारतात २०१३ मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या ६२४ घटना घडल्या असून यामध्ये ४०४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील दहशतवादी हल्ल्यांमध्येही २०१२ च्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ग्लोबल टेररिझम इंडेक्स या अहवालात म्हटले आहे. 
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने नुकतेच लंडनमध्ये ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०१४ या अहवालाचे लंडनमध्ये प्रकाशन केले आहे. या अहवालात जगभरातील १६२ देशांचा समावेश करण्यात आला आहे. दहशतवादी घटना, त्यामध्ये होणारी जीवितहानी व वित्तहानी या आधारे हा अहवाल तयार केला आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेमुळे धुमसणारा इराक हा दहशतवादग्रस्त देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानावर आहे. तर नायजेरिया चौथ्या आणि सिरीया पाचव्या क्रमांकावर आहे. या देशांच्या खालोखाल भारताचा सहावा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षी भारत पाचव्या क्रमांकावर होता. यंदा भारत एका क्रमांकाने खाली असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहशतवादी हल्ले आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडणा-यांचे प्रमाण वाढल्याचे अहवालावरुन स्पष्ट होते. गेल्या वर्षी भारतात दहशतवादी हल्ल्याच्या ५६९ घटना घडल्या होत्या. यामध्ये २३८ जणांचा मृत्यू झाला होता.