शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या नादाला लागलाय काय! भारताने श्रीलंकेला नुसता ट्रेलर दाखवला, पहिल्यांदाच असे घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 11:32 IST

श्रीलंकेच्या वागण्याविरोधात भारताने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. श्रीलंकेच्या मुद्द्यावर भारताची प्रामुख्याने दोन मूलभूत मते आहेत.

चीनच्या नादी लागून भारताच्या पाठीत सुरा खुपसणाऱ्या श्रीलंकेला भारताने संयुक्त राष्ट्रांत पहिला ट्रेलर दाखविला आहे. तामिळ अल्पसंख्यांकांवर श्रीलंकेमध्ये होत असलेल्या अत्याचारावर भारताने आवाज उठविला आहे. श्रीलंकेने भारताचा विरोध असूनही हंबनटोटा बंदरावर चिनी गुप्तहेर जहाजाला येण्याची परवानगी दिली त्याचा हा पहिला ट्रेलर असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

श्रीलंका आर्थिक संकटामुळे बेहाल झाला आहे. नागरिकांनी दोनदा तेथील सत्ता उलथविण्याचे प्रयत्न केले आहेत. राष्ट्रपतींच्या निवासात घुसून त्यांना देशाबाहेर हुसकावून लावले आहे. अशावेळी भारताने श्रीलंकेला धान्य, पेट्रोल-डिझेल देत मदत केली होती. डॉर्निअर विमानही दिले होते. गेल्या ७० वर्षांपासून भारत श्रीलंकेला वेळोवेळी मदत करत आला आहे. असे असताना श्रीलंकेने भारताच्या चिंतांकडे दुर्लक्ष करत चीनला भारतीय समुद्रात घुसण्यास मदत केली होती. यामुळे भारतानेही आता श्रीलंकेबाबतच्या आपल्या भूमिका बदलण्यास सुरुवात केली आहे. 

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) 51 वे संमेलन नुकतेच पार पडले. यामध्ये श्रीलंकेतील सलोखा, उत्तरदायित्व, मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भारताने तमिळ अल्पसंख्याकांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी भारताने श्रीलंकेतील लोकांचे जातीय मुद्द्यांवर राजकीय तोडगा काढण्यात श्रीलंका प्रगती करत नाहीय असा आक्षेप घेतला. मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणावर आणि संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांनुसार रचनात्मक आंतरराष्ट्रीय संवाद आणि सहकार्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. विशेष प्रदेशातील लोकांच्या वांशिक समस्येवर राजकीय तोडगा काढण्यासाठी श्रीलंकेच्या वचनबद्धतेवर प्रगती होत नसल्याबद्दल चिंता वक्त केली. तसेच 13 व्या दुरुस्तीच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी त्वरित आणि विश्वासार्ह कारवाईचे आवाहन केले. अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या देशात लवकरात लवकर सार्वजनिक निवडणुका घेण्याचे आवाहनही केले.

श्रीलंकेच्या वागण्याविरोधात भारताने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. श्रीलंकेच्या मुद्द्यावर भारताची प्रामुख्याने दोन मूलभूत मते आहेत. पहिले म्हणजे, श्रीलंकेच्या तमिळांसाठी न्याय, सन्मान आणि शांतता या मागणीसाठी भारत आग्रही राहील आणि दुसरे म्हणजे भारत श्रीलंकेला एकता, स्थिरता आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी मदत करत राहील, असे सुत्रांनी सांगितले. 

यावेळी भारत सरकारनेही चीनला फटकारले. हिंदी महासागरातील देशांच्या आर्थिक संकटावरून कर्जावर आधारित अर्थव्यवस्थेच्या मर्यादा काय आहेत आणि तेथील लोकांच्या राहणीमानावर नकारात्मक परिणाम होतो याचा उल्लेख केला. भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत जाण्यापासून भारताने सावध केले आहे. यामुळे तेथील पर्यटनात २० टक्के घट झाली आहे. हंबनटोटा बंदरावर चीनच्या गुप्तहेर जहाजाला थांबण्याची परवानगी राजपाक्षेंच्या काळात देण्यात आली होती. दोन्ही देशांनी हा करार अत्यंत गुप्त ठेवला होता. भारताला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी श्रीलंका सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आणि त्यानंतर जगाला याची माहिती मिळाली. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघchinaचीन