शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चीन सीमेवर भारताने दाखवली वायुशक्ती! अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात लढाऊ विमानांच्या घिरट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:27 IST

घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला युद्धसराव हा एक प्रकारे चीनला इशारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या सैनिकांना पिटाळून लावल्यानंतर आता भारताने आपली वायुशक्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे.  भारतीय हवाई दलाच्या राफेल व सुखोई लढाऊ विमानांनी ईशान्य भारतातील तेजपूर, जोरहाट, चाबुआ, हाशिमारा येथील हवाई तळांवरून उड्डाण करून तवांग येथील सीमाभागामध्ये गुरुवारी युद्धसराव केला असून, तो आज, शुक्रवारीदेखील सुरू राहणार आहे.

घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला युद्धसराव हा एक प्रकारे चीनला इशारा आहे. या विमानांचा दोन दिवस चालणारा युद्धसराव पूर्वनियोजित आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, तरीही या विमानांनी भारत-चीनच्या सीमेपर्यंत उड्डाण करणे हा चीनला सूचक इशारा असल्याचे मानण्यात येत आहे.

चिनी सैनिकांच्या अनेक वस्तू केल्या जप्त अरुणाचल प्रदेशमधील तवांग क्षेत्रात ९ डिसेंबर रोजी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ६०० चिनी सैनिकांना भारतीय लष्कराने हुसकावून लावले. त्यावेळी झालेल्या झटापटीत चिनी सैनिक आपल्याकडील अनेक वस्तू तिथेच टाकून पळून गेले. त्या वस्तू भारतीय जवानांनी जप्त केल्या असून, त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. 

ड्रोन पाठविण्याचा चीनचा प्रयत्न फसलातवांगमध्ये दोन देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या काही दिवस आधी अरुणाचलच्या सीमाभागात चीनने आपले ड्रोन पाठविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यात भारतीय हवाई दलाच्या विमानांचे महत्त्वाचे साहाय्य जवानांना झाले होते. भारताकडून प्रत्युत्तर : गोखलेनियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देऊ शकते. त्यामुळे चीनने कोणत्याही भ्रमात राहू नये, असा इशारा परराष्ट्र खात्याचे माजी सचिव विजय गोखले यांनी दिला आहे. चीनच्या कोणत्याही आगळीकीचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन