शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भारताला देश मानणाऱ्यांनी गायीला माता मानलेच पाहिजे!

By admin | Updated: August 21, 2016 03:41 IST

जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपली माता मानलेच पाहिजे, असे मत झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. तथापि, गायीच्या

कोलकाता : जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपली माता मानलेच पाहिजे, असे मत झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. तथापि, गायीच्या वा गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार केला जाऊ नये, असेही त्यांनी जोर देऊन सांगितले. गायीला वाचविण्याच्या नावाखाली अलीकडे घडलेल्या घटनांत गुरांची तस्करी करणारेही सहभागी असू शकतात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. गोमातेला वाचविण्याच्या मुद्द्यावर संपूर्ण संघ परिवार एकत्र आहे. जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपल्या मातेसमान मानायला हवे, असेही दास यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. गोहत्या व गो-गणनेच्या मुद्द्यावर त्यांचे संघाशी मतभेद असल्याच्या चर्चेबाबत छेडले असता ते म्हणाले की, संघ परिवार या मुद्द्यावर एकत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांवर टीका केली होती. अशा प्रकारचे लोक रात्री काळे कारनामे करून दिवसा गोरक्षक असल्याचे सोंग करतात, असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानावर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी टीका केली होती.पंतप्रधानांनी जे म्हटले ते योग्यच आहे. तुम्ही कोणत्याही धर्म, जातीचे असा, मात्र गाय माता आहे आणि आम्ही गायींचे रक्षण केले पाहिजे. तथापि, कोणी गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही. गुरांच्या तस्करीत गुंतलेले लोकच अशा प्रकारचे गुन्हे करतात, असे मला वाटते, असेही रघुबीर दास यांनी बोलून दाख़वले. (वृत्तसंस्था)