शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

भारताला देश मानणाऱ्यांनी गायीला माता मानलेच पाहिजे!

By admin | Updated: August 21, 2016 03:41 IST

जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपली माता मानलेच पाहिजे, असे मत झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. तथापि, गायीच्या

कोलकाता : जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपली माता मानलेच पाहिजे, असे मत झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. तथापि, गायीच्या वा गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार केला जाऊ नये, असेही त्यांनी जोर देऊन सांगितले. गायीला वाचविण्याच्या नावाखाली अलीकडे घडलेल्या घटनांत गुरांची तस्करी करणारेही सहभागी असू शकतात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. गोमातेला वाचविण्याच्या मुद्द्यावर संपूर्ण संघ परिवार एकत्र आहे. जे लोक भारताला आपला देश मानतात, त्यांनी गायीला आपल्या मातेसमान मानायला हवे, असेही दास यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. गोहत्या व गो-गणनेच्या मुद्द्यावर त्यांचे संघाशी मतभेद असल्याच्या चर्चेबाबत छेडले असता ते म्हणाले की, संघ परिवार या मुद्द्यावर एकत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांवर टीका केली होती. अशा प्रकारचे लोक रात्री काळे कारनामे करून दिवसा गोरक्षक असल्याचे सोंग करतात, असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानावर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी टीका केली होती.पंतप्रधानांनी जे म्हटले ते योग्यच आहे. तुम्ही कोणत्याही धर्म, जातीचे असा, मात्र गाय माता आहे आणि आम्ही गायींचे रक्षण केले पाहिजे. तथापि, कोणी गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही. गुरांच्या तस्करीत गुंतलेले लोकच अशा प्रकारचे गुन्हे करतात, असे मला वाटते, असेही रघुबीर दास यांनी बोलून दाख़वले. (वृत्तसंस्था)