शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

काेरोनाविरोधातील लढाईत भारत दोन लसींसह आत्मनिर्भर : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:55 IST

१६ व्या अनिवासी भारतीय दिन परिषदेचे उद्घाटन करताना मोदी यांनी सांगितले की, आपण विदेशात जेथे जेथे राहत आहात, तेथून देशाला मोठे योगदान दिले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत भारत पूर्णत: आत्मनिर्भर असून, भारत एक नव्हे तर दोन लसींसह मानवतेच्या सुरक्षेसाठी तयार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

१६ व्या अनिवासी भारतीय दिन परिषदेचे उद्घाटन करताना मोदी यांनी सांगितले की, आपण विदेशात जेथे जेथे राहत आहात, तेथून देशाला मोठे योगदान दिले आहे. पीएम केयर्स फंडास आपण दिलेल्या योगदानामुळे भारतीय आरोग्य सेवा मजबूत होत आहे. कोरोना काळात आज भारत हा सर्वाधिक कमी मृत्यूदर आणि सर्वाधिक बरे होण्याचा दर असलेला देश आहे. आज भारताकडे एक नव्हे, तर दोन ‘मेड इन इंडिया’ कोरोना लसी आहेत. या लसींसह भारत मानवतेच्या सुरक्षेसाठी सिद्ध झाला आहे. मोदी यांनी म्हटले की, आपले सामर्थ्य आणि क्षमता काय आहे, हे भारताने साथीच्या या काळात दाखवून दिले आहे. एवढा मोठा देश एकजुटीने उभा राहिला आहे, असे दुसरे उदाहरण जगात नाही.   जगभरात अडकलेल्या ४५ लाख भारतीयांना ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत भारतात आणण्यात आले. 

मातीचे संस्कारमोदी यांनी म्हटले की, आज जगाचा प्रत्येक कानाकोपरा इंटरनेटने जोडला गेलेला असेलही, पण आपले सगळ्यांचे मन भारत मातेशी जोडले गेले आहे. एकमेकांबद्दलच्या आपलेपणाने जोडले गेले आहे. मावळते वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक राहिले. या आव्हानाच्या काळात जगभरात पसरलेल्या भारतीयांनी जे कर्तव्य बजावले, ते सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. हेच तर आमच्या मातीचे संस्कार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस