शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने फेटाळला; ठणकावले, प्रथम दहशतवादावर बोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:45 IST

पाकिस्तानने भारताला वारंवार पत्रे लिहून केवळ सिंधू जल कराराच्या पाणी वाटपावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, भारतीय अधिकारी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : केवळ सिंधू जल करारावरील चर्चेत सहभागी होण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे. भविष्यातील कोणतीही चर्चा सरकारी पातळीवरच व्हायला हवी आणि त्यात दहशतवादासह सर्व द्विपक्षीय मुद्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे.

मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित

पाकिस्तानने भारताला वारंवार पत्रे लिहून केवळ सिंधू जल कराराच्या पाणी वाटपावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, भारतीय अधिकारी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. सीमापार दहशतवादाची भारताची समस्या दूर करण्याच्या संधीचा भाग म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

पाकचे जलसंपदा सचिव सय्यद अली मुर्तझा यांनी भारतीय जलशक्ती मंत्रालयाला २ पत्रे पाठवली आहेत; परंतु सूत्रांनी सांगितले की, पाकने भारताच्या जानेवारी २०२३ व सप्टेंबर २०२४ मधील दोन पत्रांकडे दुर्लक्ष केले. त्यात कराराचा आढावा आणि सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता. जलकरार स्थगित केल्यानंतरच पाक खडबडून जागा झाला असून, आता आयोग पातळीवर चर्चेचा प्रस्ताव दिलेला आहे.

अडचणी पाकिस्तानच्या, फायदा भारताचा...

हा करार मोठ्या प्रमाणावर पाकला अनुकूल असला तरी पाकच्या वाट्याला आलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी दरवर्षी ३.३ अब्ज घनमीटर पाणी पाकिस्तानमध्ये न वापरता वाहून जाते. याच्या उलट भारताने मोठ्या कालव्याच्या प्रकल्पाला गती दिली आहे. बियास नदीपासून राजस्थानमधील श्री गंगानगरपर्यंत १३० किलोमीटर लांबीचा जलवाहिनी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. दुसऱ्या ७० किलोमीटरच्या टप्प्यात ही प्रणाली यमुना नदीशी जोडली जाणार आहे. यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा व राजस्थानला फायदा होईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान