शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने फेटाळला; ठणकावले, प्रथम दहशतवादावर बोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:45 IST

पाकिस्तानने भारताला वारंवार पत्रे लिहून केवळ सिंधू जल कराराच्या पाणी वाटपावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, भारतीय अधिकारी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : केवळ सिंधू जल करारावरील चर्चेत सहभागी होण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे. भविष्यातील कोणतीही चर्चा सरकारी पातळीवरच व्हायला हवी आणि त्यात दहशतवादासह सर्व द्विपक्षीय मुद्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे.

मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित

पाकिस्तानने भारताला वारंवार पत्रे लिहून केवळ सिंधू जल कराराच्या पाणी वाटपावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, भारतीय अधिकारी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. सीमापार दहशतवादाची भारताची समस्या दूर करण्याच्या संधीचा भाग म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

पाकचे जलसंपदा सचिव सय्यद अली मुर्तझा यांनी भारतीय जलशक्ती मंत्रालयाला २ पत्रे पाठवली आहेत; परंतु सूत्रांनी सांगितले की, पाकने भारताच्या जानेवारी २०२३ व सप्टेंबर २०२४ मधील दोन पत्रांकडे दुर्लक्ष केले. त्यात कराराचा आढावा आणि सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता. जलकरार स्थगित केल्यानंतरच पाक खडबडून जागा झाला असून, आता आयोग पातळीवर चर्चेचा प्रस्ताव दिलेला आहे.

अडचणी पाकिस्तानच्या, फायदा भारताचा...

हा करार मोठ्या प्रमाणावर पाकला अनुकूल असला तरी पाकच्या वाट्याला आलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी दरवर्षी ३.३ अब्ज घनमीटर पाणी पाकिस्तानमध्ये न वापरता वाहून जाते. याच्या उलट भारताने मोठ्या कालव्याच्या प्रकल्पाला गती दिली आहे. बियास नदीपासून राजस्थानमधील श्री गंगानगरपर्यंत १३० किलोमीटर लांबीचा जलवाहिनी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. दुसऱ्या ७० किलोमीटरच्या टप्प्यात ही प्रणाली यमुना नदीशी जोडली जाणार आहे. यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा व राजस्थानला फायदा होईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान