शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:32 IST

भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. चीनवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. राजनाथ सिंह यांनी हे मान्य केले की, चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे.भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.राजनाथ यांच्या निवेदनावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांना बोलण्याची परवानगी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे सदस्य विरोध दाखवून सभागृहातून निघून गेले. सभागृहाबाहेर अधीर रंजन यांनी आरोप केला की, सरकार विरोधकांचा आवाज ऐकत नाही कारण त्याला भीती आहे की, जे खोटे बोलले जात आहे ते उघडे पडेल. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, ते लडाखवर चर्चा करू इच्छित नाही.राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर लगेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसते की, मोदी यांनी देशाची चिनी अतिक्रमणावर दिशाभूल केली, देश लष्करासोबत उभा राहील. परंतु, मोदीजी तुम्ही कधी चीनविरुद्ध उभे राहाल? चीनकडून आमच्या देशाची जमीन केव्हा परत घेणार, चीनचे नाव घ्यायला घाबरू नका.’सरकारच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने आरोप केला की, मोदी आणि त्यांचे सरकार संसदेत व बाहेर चिनी घुसखोरीवरून खोटे बोलत आहे.

टॅग्स :chinaचीनRajnath Singhराजनाथ सिंह