शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टेबलाच्या खालून घेणाऱ्यांमध्ये १८० देशांत भारत ९३व्या स्थानी, निर्देशांकात किंचित सुधारणा, भ्रष्टाचारविरोधी अजेंडा चालविता येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:46 IST

Bribe Case: जगभरात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली असून, भ्रष्टाचार करण्यात भारत २०२३ मध्ये १८० देशांच्या तुलनेत ९३व्या स्थानावर राहिला आहे. २०२२ मध्ये तो ८५व्या स्थानावर होता.

नवी दिल्ली : जगभरात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली असून, भ्रष्टाचार करण्यात भारत २०२३ मध्ये १८० देशांच्या तुलनेत ९३व्या स्थानावर राहिला आहे. २०२२ मध्ये तो ८५व्या स्थानावर होता. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार कमी करण्यात यश आले आहे. भारताचा निर्देशांक गेल्या वर्षांच्या तुलनेत ३९ वरून ४० इतकाच सुधारला आहे. भ्रष्टाचाराचे सर्वात कमी प्रमाण डेन्मार्कमध्ये आहे. 

३७ लाखांपेक्षा अधिक सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा करून चीनने (७६) आक्रमक भ्रष्टाचारविरोधी कारवाई केली आहे.७१ टक्के आशिया आणि पॅसिफिकमधील देशांचा सीपीआय स्कोअर ४५ पेक्षा कमी आहे.

निवडणुका असतानाही नियंत्रण नाहीआशिया क्षेत्रात २०२४ हे वर्ष निवडणुकीचे आहे. बांगलादेश, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, सोलोमन बेटे, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील लोक मतदानासाठी बाहेर पडणार आहेत. मात्र अहवालानुसार भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेने येथील सरकारांनी काही खास प्रगती केलेली नाही.

भ्रष्टाचार वाढल्याने काय होते?भ्रष्टाचारविरोधी अजेंडा चालविता येत नाही. नागरिक व माध्यमांवर हल्ले होतात. असेंब्ली, असोसिएशन स्वातंत्र्यावरील हल्लेही वाढतात, असे अहवालात म्हटले आहे.

जोपर्यंत न्यायव्यवस्था भ्रष्टाचारी व्यक्तीला दंड देत नाही आणि सरकारवर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार वाढत जाईल. जेव्हा न्यायच विकला जातो किंवा राजकीय हस्तक्षेप केला जातो तेव्हा नागरिकांना त्याची झळ सोसावी लागते.- फ्रँकोइस व्हॅलेरियन, अध्यक्ष, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल

भारताला धोका का? - भ्रष्टाचार मोजण्यासाठी ० ते १०० ही स्केल वापरण्यात आली आहे. ० हा अत्यंत भ्रष्ट, तर १०० हा स्कोअर अतिशय स्वच्छ देश म्हणून नोंदविण्यात येते. भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण  किंचित कमी झाले आहे. - भारताबाबत ठोस निष्कर्ष काढता येत नाही. मात्र निवडणुकीपूर्वी, नागरिकांच्या हक्कांवर गदा येताना दिसते. दूरसंचार विधेयक मंजूर करणे हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी एक ‘गंभीर धोका’ आहे, असे अहवालात म्हटले आहे.पाक, बांगलादेशची स्थिती सुधारलीसरकारवर नियंत्रण ठेवण्यास पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये यश आले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनेच्या कलम १९ए अंतर्गत नागरिकांचा माहितीचा अधिकार मजबूत केला आहे, तर बांगलादेश (१४९) हा अल्पविकसित देशांच्या स्थितीतून बाहेर आला आहे. येथील आर्थिक वाढीमुळे गरिबीत सतत घट होण्यास आणि राहणीमान सुधारण्यास मदत होत आहे. मात्र माध्यमांवरील बंदीमुळे माहितीच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचार