शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

टेबलाच्या खालून घेणाऱ्यांमध्ये १८० देशांत भारत ९३व्या स्थानी, निर्देशांकात किंचित सुधारणा, भ्रष्टाचारविरोधी अजेंडा चालविता येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:46 IST

Bribe Case: जगभरात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली असून, भ्रष्टाचार करण्यात भारत २०२३ मध्ये १८० देशांच्या तुलनेत ९३व्या स्थानावर राहिला आहे. २०२२ मध्ये तो ८५व्या स्थानावर होता.

नवी दिल्ली : जगभरात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली असून, भ्रष्टाचार करण्यात भारत २०२३ मध्ये १८० देशांच्या तुलनेत ९३व्या स्थानावर राहिला आहे. २०२२ मध्ये तो ८५व्या स्थानावर होता. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार कमी करण्यात यश आले आहे. भारताचा निर्देशांक गेल्या वर्षांच्या तुलनेत ३९ वरून ४० इतकाच सुधारला आहे. भ्रष्टाचाराचे सर्वात कमी प्रमाण डेन्मार्कमध्ये आहे. 

३७ लाखांपेक्षा अधिक सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा करून चीनने (७६) आक्रमक भ्रष्टाचारविरोधी कारवाई केली आहे.७१ टक्के आशिया आणि पॅसिफिकमधील देशांचा सीपीआय स्कोअर ४५ पेक्षा कमी आहे.

निवडणुका असतानाही नियंत्रण नाहीआशिया क्षेत्रात २०२४ हे वर्ष निवडणुकीचे आहे. बांगलादेश, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, सोलोमन बेटे, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील लोक मतदानासाठी बाहेर पडणार आहेत. मात्र अहवालानुसार भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेने येथील सरकारांनी काही खास प्रगती केलेली नाही.

भ्रष्टाचार वाढल्याने काय होते?भ्रष्टाचारविरोधी अजेंडा चालविता येत नाही. नागरिक व माध्यमांवर हल्ले होतात. असेंब्ली, असोसिएशन स्वातंत्र्यावरील हल्लेही वाढतात, असे अहवालात म्हटले आहे.

जोपर्यंत न्यायव्यवस्था भ्रष्टाचारी व्यक्तीला दंड देत नाही आणि सरकारवर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार वाढत जाईल. जेव्हा न्यायच विकला जातो किंवा राजकीय हस्तक्षेप केला जातो तेव्हा नागरिकांना त्याची झळ सोसावी लागते.- फ्रँकोइस व्हॅलेरियन, अध्यक्ष, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल

भारताला धोका का? - भ्रष्टाचार मोजण्यासाठी ० ते १०० ही स्केल वापरण्यात आली आहे. ० हा अत्यंत भ्रष्ट, तर १०० हा स्कोअर अतिशय स्वच्छ देश म्हणून नोंदविण्यात येते. भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण  किंचित कमी झाले आहे. - भारताबाबत ठोस निष्कर्ष काढता येत नाही. मात्र निवडणुकीपूर्वी, नागरिकांच्या हक्कांवर गदा येताना दिसते. दूरसंचार विधेयक मंजूर करणे हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी एक ‘गंभीर धोका’ आहे, असे अहवालात म्हटले आहे.पाक, बांगलादेशची स्थिती सुधारलीसरकारवर नियंत्रण ठेवण्यास पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये यश आले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनेच्या कलम १९ए अंतर्गत नागरिकांचा माहितीचा अधिकार मजबूत केला आहे, तर बांगलादेश (१४९) हा अल्पविकसित देशांच्या स्थितीतून बाहेर आला आहे. येथील आर्थिक वाढीमुळे गरिबीत सतत घट होण्यास आणि राहणीमान सुधारण्यास मदत होत आहे. मात्र माध्यमांवरील बंदीमुळे माहितीच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचार