शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

By admin | Updated: September 16, 2016 09:53 IST

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - दहशतवाद प्रभावित देशांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये भारताचादेखील समावेश आहे. 2015 मध्ये जगभरात एकूण 11,774 दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये 28,328 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 35,320 लोक जखमी झाले आहेत. भारतामधील दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण 43 टक्के असून यापैकी 791 हल्ले नक्षलवाद्यांनी केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 289 भारतीयांनी आपला जीव गमावला आहे. भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे. 
 
जगभरात तालिबान, इसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांची दहशत आहे. त्यानंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो. 2015 मध्ये नक्षलवाद्यांनी 343 हल्ले केले असून यामध्ये 176 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तालिबानने 1,093 हल्ले केले असून 4,512 लोकांचा जीव घेतला. इसीसने 931 हल्ले केले असून यामध्ये तब्बल 6,050 लोकांनी आपला जीव गमावला. बोको हराम 491 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असून 5,450 लोकांच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरले. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी संघटनादेखील पहिल्या पाचमध्ये असून 283 हल्ल्यांमध्ये 287 लोकांचा त्यांनी जीव घेतला. 
 
दहशतवादाशी सामना करण्यासाठी भारत पुर्णपणे प्रयत्न करत आहे. भारतातील चार राज्यांमध्ये अर्ध्याहून जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमध्ये 21 टक्के, मणिपूरमध्ये 12 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 11 टक्के, झारखंडमध्ये 10 टक्के दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमधील दहशतवादी हल्ल्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलं असून 2014 मध्ये जिथे 76 हल्ले झाले होते तो आकडा 2014 मध्ये 167 वर पोहोचला आहे. 
 
भारत चौथ्या क्रमांकावर असणे ही काळजीची गोष्ट असली तरी अनेक दहशतवादी हल्ले प्राणघातक नव्हते. त्यांची प्राणघातक क्षमता कमी होती. तसंच भारताकडून दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या उत्तरात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. 2015 मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा आकडा दुप्पट झाला आहे. 2014 मध्ये 7 टक्के दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं, पण 2015 मध्ये हा आकडा 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगभरात एकूण 6,924 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.