शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

By admin | Updated: September 16, 2016 09:53 IST

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - दहशतवाद प्रभावित देशांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये भारताचादेखील समावेश आहे. 2015 मध्ये जगभरात एकूण 11,774 दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये 28,328 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 35,320 लोक जखमी झाले आहेत. भारतामधील दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण 43 टक्के असून यापैकी 791 हल्ले नक्षलवाद्यांनी केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 289 भारतीयांनी आपला जीव गमावला आहे. भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे. 
 
जगभरात तालिबान, इसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांची दहशत आहे. त्यानंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो. 2015 मध्ये नक्षलवाद्यांनी 343 हल्ले केले असून यामध्ये 176 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तालिबानने 1,093 हल्ले केले असून 4,512 लोकांचा जीव घेतला. इसीसने 931 हल्ले केले असून यामध्ये तब्बल 6,050 लोकांनी आपला जीव गमावला. बोको हराम 491 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असून 5,450 लोकांच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरले. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी संघटनादेखील पहिल्या पाचमध्ये असून 283 हल्ल्यांमध्ये 287 लोकांचा त्यांनी जीव घेतला. 
 
दहशतवादाशी सामना करण्यासाठी भारत पुर्णपणे प्रयत्न करत आहे. भारतातील चार राज्यांमध्ये अर्ध्याहून जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमध्ये 21 टक्के, मणिपूरमध्ये 12 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 11 टक्के, झारखंडमध्ये 10 टक्के दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमधील दहशतवादी हल्ल्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलं असून 2014 मध्ये जिथे 76 हल्ले झाले होते तो आकडा 2014 मध्ये 167 वर पोहोचला आहे. 
 
भारत चौथ्या क्रमांकावर असणे ही काळजीची गोष्ट असली तरी अनेक दहशतवादी हल्ले प्राणघातक नव्हते. त्यांची प्राणघातक क्षमता कमी होती. तसंच भारताकडून दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या उत्तरात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. 2015 मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा आकडा दुप्पट झाला आहे. 2014 मध्ये 7 टक्के दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं, पण 2015 मध्ये हा आकडा 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगभरात एकूण 6,924 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.