शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

By admin | Updated: September 16, 2016 09:53 IST

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - दहशतवाद प्रभावित देशांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये भारताचादेखील समावेश आहे. 2015 मध्ये जगभरात एकूण 11,774 दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये 28,328 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 35,320 लोक जखमी झाले आहेत. भारतामधील दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण 43 टक्के असून यापैकी 791 हल्ले नक्षलवाद्यांनी केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 289 भारतीयांनी आपला जीव गमावला आहे. भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे. 
 
जगभरात तालिबान, इसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांची दहशत आहे. त्यानंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो. 2015 मध्ये नक्षलवाद्यांनी 343 हल्ले केले असून यामध्ये 176 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तालिबानने 1,093 हल्ले केले असून 4,512 लोकांचा जीव घेतला. इसीसने 931 हल्ले केले असून यामध्ये तब्बल 6,050 लोकांनी आपला जीव गमावला. बोको हराम 491 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असून 5,450 लोकांच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरले. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी संघटनादेखील पहिल्या पाचमध्ये असून 283 हल्ल्यांमध्ये 287 लोकांचा त्यांनी जीव घेतला. 
 
दहशतवादाशी सामना करण्यासाठी भारत पुर्णपणे प्रयत्न करत आहे. भारतातील चार राज्यांमध्ये अर्ध्याहून जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमध्ये 21 टक्के, मणिपूरमध्ये 12 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 11 टक्के, झारखंडमध्ये 10 टक्के दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमधील दहशतवादी हल्ल्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलं असून 2014 मध्ये जिथे 76 हल्ले झाले होते तो आकडा 2014 मध्ये 167 वर पोहोचला आहे. 
 
भारत चौथ्या क्रमांकावर असणे ही काळजीची गोष्ट असली तरी अनेक दहशतवादी हल्ले प्राणघातक नव्हते. त्यांची प्राणघातक क्षमता कमी होती. तसंच भारताकडून दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या उत्तरात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. 2015 मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा आकडा दुप्पट झाला आहे. 2014 मध्ये 7 टक्के दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं, पण 2015 मध्ये हा आकडा 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगभरात एकूण 6,924 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.