शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"बढाया मारणं बास झालं, आता...", अनंतनाग चकमकीच्या घटनेवरून फारुख अब्दुल्ला संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:06 IST

अनंतनागच्या चकमकीत भारताचे तीन लष्करी अधिकारी शहीद झाले

Anantnag Encounter, Jammu Kashmir : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अनंतनाग चकमकीवर वक्तव्य केले आहे. या चकमकीत देशातील तीन लष्करी अधिकारी शहीद झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने अहंकार बाजूला ठेवून चर्चा करावी. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, सरकार दररोज दहशतवाद संपल्याचे श्रेय घेत असते. आता सांगा, दहशतवाद संपला आहे का? जोपर्यंत शांतता आणू शकेल असा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत हे प्रकार संपणार नाहीत. त्यामुळे बढाया मारणं थांबवा आणि एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढा, असे त्यांनी सुचवले.

"संघर्षाने शांतता येत नाही. संवादातून शांतता येते. युद्धामुळे युक्रेनची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता. युक्रेन सध्या उद्ध्वस्त आहे आणि कुठेही बाहेर पडण्याचा मार्ग नाही. रशिया आणि युक्रेनला चर्चा करून हे प्रकरण सोडवावे लागेल. तसेच भारत आणि पाकिस्तानलाही चर्चा करावी लागेल. दोन्ही देशांनी अहंकार सोडून टेबलावर बसून चर्चा करणे गरजेचे आहे", असा सल्ला अब्दुल्ला यांनी दिला.

अनंतनागच्या कोकोरेनाग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मंगळवारी रात्री दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. कर्नल मनप्रीत सिंग या संघाचे नेतृत्व करत होते. सुरक्षा दल उंचीवर उपस्थित दहशतवाद्यांच्या दिशेने सरकले. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. कर्नल मनप्रीत, मेजर आशिष, डीएसपी हुमायून दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जखमी झाले. त्याला घाईघाईने एअरलिफ्ट करण्यात आले. तिघांना वाचवता आले नाही.

टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सुरक्षा दलावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर अनंतनागमध्ये सुरक्षा दलांचे दहशतवादविरोधी अभियान सुरू आहे.

टॅग्स :anantnag-pcअनंतनागJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला