शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"बढाया मारणं बास झालं, आता...", अनंतनाग चकमकीच्या घटनेवरून फारुख अब्दुल्ला संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:06 IST

अनंतनागच्या चकमकीत भारताचे तीन लष्करी अधिकारी शहीद झाले

Anantnag Encounter, Jammu Kashmir : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अनंतनाग चकमकीवर वक्तव्य केले आहे. या चकमकीत देशातील तीन लष्करी अधिकारी शहीद झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने अहंकार बाजूला ठेवून चर्चा करावी. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, सरकार दररोज दहशतवाद संपल्याचे श्रेय घेत असते. आता सांगा, दहशतवाद संपला आहे का? जोपर्यंत शांतता आणू शकेल असा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत हे प्रकार संपणार नाहीत. त्यामुळे बढाया मारणं थांबवा आणि एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढा, असे त्यांनी सुचवले.

"संघर्षाने शांतता येत नाही. संवादातून शांतता येते. युद्धामुळे युक्रेनची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता. युक्रेन सध्या उद्ध्वस्त आहे आणि कुठेही बाहेर पडण्याचा मार्ग नाही. रशिया आणि युक्रेनला चर्चा करून हे प्रकरण सोडवावे लागेल. तसेच भारत आणि पाकिस्तानलाही चर्चा करावी लागेल. दोन्ही देशांनी अहंकार सोडून टेबलावर बसून चर्चा करणे गरजेचे आहे", असा सल्ला अब्दुल्ला यांनी दिला.

अनंतनागच्या कोकोरेनाग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मंगळवारी रात्री दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. कर्नल मनप्रीत सिंग या संघाचे नेतृत्व करत होते. सुरक्षा दल उंचीवर उपस्थित दहशतवाद्यांच्या दिशेने सरकले. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. कर्नल मनप्रीत, मेजर आशिष, डीएसपी हुमायून दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जखमी झाले. त्याला घाईघाईने एअरलिफ्ट करण्यात आले. तिघांना वाचवता आले नाही.

टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सुरक्षा दलावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर अनंतनागमध्ये सुरक्षा दलांचे दहशतवादविरोधी अभियान सुरू आहे.

टॅग्स :anantnag-pcअनंतनागJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला