शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:39 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरू झाल्या आहेत. सलग १२व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधी धुडकावून लावण्यात आली.

India Pakistan News Marathi: पहलगामजवळ असलेल्या बैसरन पठारावर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, पाकिस्तानकडून सीमेपलिकडून कुरापती केल्या जात आहे. २२ एप्रिलपासून पाकिस्तान लष्कराकडून सातत्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला जात आहे. इतर ठिकाणीही शस्त्रसंधींचं पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात असलं, तरी पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबत नसल्याची स्थिती आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या घटनेला आता १२ दिवस लोटले आहेत. त्यानंतर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई सुरू केली आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराकडूनच सीमेपलीकडून शस्त्रसंधीला वाकुल्या दाखवण्याचे काम सुरू आहे. 

पाकिस्तानी लष्कराकडून कुठे गोळीबार करण्यात आला?

जम्मूतील सीमेलगत असलेल्या पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागात, तर काश्मीरमधील बारामुला सेक्टरमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचं पाकिस्तानी लष्कराने उल्लंघन केले. 

वाचा >>देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय लष्करानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पाकिस्तान लष्कराकडून सलग १२ व्या दिवशी गोळीबार करण्यात आला आहे. 

भारताकडून पाकिस्तानची कोंडी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावले उचलली आहेत. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. इतकं नाही, तर वाघा-अटारी सीमाही बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना परत पाठवण्याची कारवाई सुरू आहे. 

भारताने पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसोबतचा व्यापारही थांबवला आहे. पाकिस्तान भारत यांच्यातील टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाBorderसीमारेषाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान