शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:39 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरू झाल्या आहेत. सलग १२व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधी धुडकावून लावण्यात आली.

India Pakistan News Marathi: पहलगामजवळ असलेल्या बैसरन पठारावर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, पाकिस्तानकडून सीमेपलिकडून कुरापती केल्या जात आहे. २२ एप्रिलपासून पाकिस्तान लष्कराकडून सातत्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला जात आहे. इतर ठिकाणीही शस्त्रसंधींचं पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात असलं, तरी पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबत नसल्याची स्थिती आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या घटनेला आता १२ दिवस लोटले आहेत. त्यानंतर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई सुरू केली आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराकडूनच सीमेपलीकडून शस्त्रसंधीला वाकुल्या दाखवण्याचे काम सुरू आहे. 

पाकिस्तानी लष्कराकडून कुठे गोळीबार करण्यात आला?

जम्मूतील सीमेलगत असलेल्या पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागात, तर काश्मीरमधील बारामुला सेक्टरमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचं पाकिस्तानी लष्कराने उल्लंघन केले. 

वाचा >>देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय लष्करानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पाकिस्तान लष्कराकडून सलग १२ व्या दिवशी गोळीबार करण्यात आला आहे. 

भारताकडून पाकिस्तानची कोंडी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावले उचलली आहेत. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. इतकं नाही, तर वाघा-अटारी सीमाही बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना परत पाठवण्याची कारवाई सुरू आहे. 

भारताने पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसोबतचा व्यापारही थांबवला आहे. पाकिस्तान भारत यांच्यातील टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाBorderसीमारेषाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान