शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात भाजप सत्तेबाहेर कसा राहणार? अखिलेश यादव यांनी फॉर्म्युला विरोधकांना दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 11:53 IST

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून विरोधी पक्ष एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली आहे. दरम्यान आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या  सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांना नवा फॉर्म्युला दिला आहे. भाजपला देशातील सत्तेतून कसे बाहेर फेकले जाऊ शकते हे त्यांनी सांगितले आहे.उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तरच केंद्रातील सत्तेतून  भाजप बाहेर पडेल, असं त्यांनी सांगितलं.

मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश सर्वात मोठी भूमिका बजावेल. राज्यातील जनता भाजपचा पराभव करेल. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला तर त्यांची देशातील सत्ता जाईल. समाजवाद्यांनी नारा दिला आहे. ८० चा पराभव करा, भाजपला हटवा. समाजवादी पक्ष हा नारा घेऊन काम करत आहे", असंही अखिलेश यादव म्हणाले.

"उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप सरकार सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. जात जनगणनेच्या विरोधात आहे. जात जनगणनेशिवाय सामाजिक न्याय मिळू शकत नाही.

अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकारची झिरो टॉलरन्स शून्य झाली आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. उत्तर प्रदेशात मुली, माता आणि बहिणींवर सर्वाधिक अन्याय होत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचे उत्तर भाजपकडे नाही.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रणाबाबत बोलताना यादव म्हणाले, देवाकडून कुणालाही निमंत्रण मिळत नाही, देव स्वत: ज्याला हवे त्याला निमंत्रण देतो. देव आपोआप बोलावतो. देवाने बोलावले तर आपण जाऊ.

'इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल'

'इंडिया' आघाडीच्या जागावाटपावर अखिलेश यादव म्हणाले, जागा वाटप हा मोठा प्रश्न नाही, तर येणार्‍या निवडणुकीत विरोधी आघाडी भारतीय जनता पक्षाचा पराभव करेल का हा मोठा प्रश्न आहे. भाजपला हटवून लोकशाही वाचेल आणि ईव्हीएम आपोआप हटतील, असा समाजवादी पक्षाचा विश्वास आहे, असंही ते म्हणाले. 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप पुन्हा आले तर जनतेचा मतदानाचा हक्क हिरावून घेईल. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने जनता त्रस्त आहे. कोणालाच न्याय मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल, असा विश्वासही अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी