शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

देशात भाजप सत्तेबाहेर कसा राहणार? अखिलेश यादव यांनी फॉर्म्युला विरोधकांना दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 11:53 IST

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून विरोधी पक्ष एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली आहे. दरम्यान आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या  सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांना नवा फॉर्म्युला दिला आहे. भाजपला देशातील सत्तेतून कसे बाहेर फेकले जाऊ शकते हे त्यांनी सांगितले आहे.उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तरच केंद्रातील सत्तेतून  भाजप बाहेर पडेल, असं त्यांनी सांगितलं.

मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश सर्वात मोठी भूमिका बजावेल. राज्यातील जनता भाजपचा पराभव करेल. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला तर त्यांची देशातील सत्ता जाईल. समाजवाद्यांनी नारा दिला आहे. ८० चा पराभव करा, भाजपला हटवा. समाजवादी पक्ष हा नारा घेऊन काम करत आहे", असंही अखिलेश यादव म्हणाले.

"उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप सरकार सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. जात जनगणनेच्या विरोधात आहे. जात जनगणनेशिवाय सामाजिक न्याय मिळू शकत नाही.

अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकारची झिरो टॉलरन्स शून्य झाली आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. उत्तर प्रदेशात मुली, माता आणि बहिणींवर सर्वाधिक अन्याय होत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचे उत्तर भाजपकडे नाही.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रणाबाबत बोलताना यादव म्हणाले, देवाकडून कुणालाही निमंत्रण मिळत नाही, देव स्वत: ज्याला हवे त्याला निमंत्रण देतो. देव आपोआप बोलावतो. देवाने बोलावले तर आपण जाऊ.

'इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल'

'इंडिया' आघाडीच्या जागावाटपावर अखिलेश यादव म्हणाले, जागा वाटप हा मोठा प्रश्न नाही, तर येणार्‍या निवडणुकीत विरोधी आघाडी भारतीय जनता पक्षाचा पराभव करेल का हा मोठा प्रश्न आहे. भाजपला हटवून लोकशाही वाचेल आणि ईव्हीएम आपोआप हटतील, असा समाजवादी पक्षाचा विश्वास आहे, असंही ते म्हणाले. 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप पुन्हा आले तर जनतेचा मतदानाचा हक्क हिरावून घेईल. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने जनता त्रस्त आहे. कोणालाच न्याय मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल, असा विश्वासही अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी