शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशात भाजप सत्तेबाहेर कसा राहणार? अखिलेश यादव यांनी फॉर्म्युला विरोधकांना दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 11:53 IST

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून विरोधी पक्ष एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली आहे. दरम्यान आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या  सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांना नवा फॉर्म्युला दिला आहे. भाजपला देशातील सत्तेतून कसे बाहेर फेकले जाऊ शकते हे त्यांनी सांगितले आहे.उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तरच केंद्रातील सत्तेतून  भाजप बाहेर पडेल, असं त्यांनी सांगितलं.

मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश सर्वात मोठी भूमिका बजावेल. राज्यातील जनता भाजपचा पराभव करेल. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला तर त्यांची देशातील सत्ता जाईल. समाजवाद्यांनी नारा दिला आहे. ८० चा पराभव करा, भाजपला हटवा. समाजवादी पक्ष हा नारा घेऊन काम करत आहे", असंही अखिलेश यादव म्हणाले.

"उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप सरकार सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. जात जनगणनेच्या विरोधात आहे. जात जनगणनेशिवाय सामाजिक न्याय मिळू शकत नाही.

अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकारची झिरो टॉलरन्स शून्य झाली आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. उत्तर प्रदेशात मुली, माता आणि बहिणींवर सर्वाधिक अन्याय होत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचे उत्तर भाजपकडे नाही.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रणाबाबत बोलताना यादव म्हणाले, देवाकडून कुणालाही निमंत्रण मिळत नाही, देव स्वत: ज्याला हवे त्याला निमंत्रण देतो. देव आपोआप बोलावतो. देवाने बोलावले तर आपण जाऊ.

'इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल'

'इंडिया' आघाडीच्या जागावाटपावर अखिलेश यादव म्हणाले, जागा वाटप हा मोठा प्रश्न नाही, तर येणार्‍या निवडणुकीत विरोधी आघाडी भारतीय जनता पक्षाचा पराभव करेल का हा मोठा प्रश्न आहे. भाजपला हटवून लोकशाही वाचेल आणि ईव्हीएम आपोआप हटतील, असा समाजवादी पक्षाचा विश्वास आहे, असंही ते म्हणाले. 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप पुन्हा आले तर जनतेचा मतदानाचा हक्क हिरावून घेईल. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने जनता त्रस्त आहे. कोणालाच न्याय मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल, असा विश्वासही अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी