शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

CoronaVirus: धोका वाढला! कोरोना तिसऱ्या टप्प्यात; आता वेगाने होऊ शकतो गुणाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:46 IST

CoronaVirus: तिसऱ्या टप्प्यात वेगानं वाढणार रुग्णांची संख्या; आरोग्य यंत्रणेची पुरेशी तयारी नाही

नवी दिल्ली: कोरोनाचा धोका वाढला असून तो तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याचं कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांचे संयोजक डॉ. गिरधर ग्यानी यांनी सांगितलं. कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असून त्याचं सामुदायिक संक्रमण सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. 'द क्विंट' या इंग्रजी वृत्त संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलंय. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे.  दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली प्रख्यात डॉक्टरांची आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ग्यानी उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात सामुदायिक संक्रमण अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात कोरोना अतिशय वेगानं पसरतो आणि त्याचा केंद्रबिंदू शोधणं अवघड होतं. या टप्प्यात अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे तो नेमका कोणाकडून पसरला आहे, याचा माग काढणं कठीण असतं, अशा शब्दांत ग्यानी यांनी तिसऱ्या टप्प्यात काय होऊ शकतं, याची माहिती दिली.आपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आपल्या हाती अतिशय कमी वेळ उरला आहे. वाढणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयं सज्ज ठेवावी लागणार आहेत. मात्र त्यासाठीही पुरेसा वेळ शिल्लक नाही. येत्या काही आठवड्यांमध्ये कधीही रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते. त्यासाठी आवश्यक रुग्णालयं आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्ग आपल्याकडे नाही, अशा शब्दांत ग्यानी यांनी वास्तव सांगितलं.कोरोना चाचणी घेत असताना सरकार अजूनही जुन्याच पद्धतींचा वापर करत असल्याचं ग्यानी म्हणाले. यामध्ये तातडीनं बदल करायला हवा, असंदेखील ते पुढे म्हणाले. 'खोकला, श्वासोच्छवासात समस्या, ताप अशी तिन्ही लक्षणं आढळून येत असल्यावरच सध्या कोरोना चाचणी घेतली जात आहे. यातलं एक केवळ लक्षण असल्यास चाचणीच घेतली जात नाही. ही पद्धत बदलायला हवी. सरकारकडे कोरोना चाचणी करणारी पुरेशी किटदेखील नाहीत,' अशी महत्त्वाची माहिती ग्यानी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या