शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

भारताला यजमानपद नाही

By admin | Updated: April 27, 2015 23:32 IST

भारताच्या २0२४ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीच्या शक्यतेविषयी होणाऱ्या युक्तिवादाला पूर्णविराम देताना पंतप्रधानांनी बैठकीदरम्यान याविषयीचा प्रस्ताव दिला नसल्याचे म्हटले आहे.

थॉमस बाक यांची भारतभेट : पंतप्रधानांनी प्रस्ताव दिला नाहीनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी आज भारताच्या २0२४ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीच्या शक्यतेविषयी होणाऱ्या युक्तिवादाला पूर्णविराम देताना पंतप्रधानांनी बैठकीदरम्यान याविषयीचा प्रस्ताव दिला नसल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे गेल्या वर्षीच निलंबन समाप्त झाल्यामुळे आता यशस्वी खेळांचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही, असे आयओसीला वाटत असल्याचे बाक म्हणाले. २0१३ मध्ये आयओसीचे अध्यक्ष झाल्यानंतर बाक प्रथमच भारत दौऱ्यावर आले. बाक यांनी भारतातील एकदिवसीय दौऱ्यादरम्यान आज सायंकाळी पंतप्रधानांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी बाक यांनी भारतीय आॅलिम्पिक महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाच्या अव्वल अधिकाऱ्यांशी वेगवेगळी चर्चा केली.यासाठी पूर्ण तयारी आणि परिपूर्ण माहितीनंतरच आॅलिम्पिकचे यजमानपद घ्यायला हवे असे पंतप्रधानांचे मत आहे. त्यामुळे यजमानपदासाठी आधी पंतप्रधानांकडून मान्यता असायला हवी, असे बाक यांनी सांगितले. बाक म्हणाले, आॅलिम्पिक यजमानपदाविषयीच्या चर्चेची माहिती होती. त्यामुळे थोडे आश्चर्य वाटले. कारण भारतासाठी स्पर्धेचे यजमानपद पत्करणे घाईचे ठरले असते. भारताचे गेल्या वर्षीच निलंबन संपले याचा आपल्याला आनंद वाटतोय; परंतु आयओएला आपली स्थिती आणखी मजबूत करायची आहे.बाक यांनी पंतप्रधानांसोबतची चर्चा चांगली झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आॅलिम्पिकच्या यजमानपदाविषयीच्या संभाव्य दावेदारीविषयीही चर्चा झाली. तथापि, पंतप्रधान दावेदारी सादर करण्याआधी पूर्णपणे तयारी करूइच्छितात आणि त्यातील परिपूर्णता प्राप्त करूइच्छितात. पंतप्रधानांनुसार २0२४ च्या यशस्वी दावेदारी (१५ सप्टेंबरच्या डेडलाईनआधी) करणे कठीण आहे.’’बाक यांनी सांगितले की, भारत सरकार, आयओए आणि आयओसीदरम्यान एका करारावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानुसार जगातील सर्वोच्च क्रीडा संस्था ‘‘प्रशिक्षण, क्रीडा औद्योगिकरण, क्रीडा प्रशासक आणि प्रशिक्षकांना प्रशिक्षण’ यात मदत करेल आणि खेळातील द्विपक्षीय सहयोग स्थापन करेल.’ त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांना आयओसीची एक बैठक भारतात आयोजित करण्याचे निमंत्रणही दिले. (वृत्तसंस्था)भारत खेळाच्या पायाभूत सुविधांचे केंद्र व्हावेच्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत खेळाच्या पायाभूत सुविधांचे आणि साधनांच्या निर्माणाचे एक मुख्य केंद्र व्हावे यासाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी)कडून मदत घेण्यासाठी म्हटले आहे. च्बैठकीदरम्यान मोदी यांनी म्हटले, कोणत्याही देशासाठी आपल्या नागरिकांमध्ये खिलाडूवृत्तीसाठी खेळ आवश्यक आहे आणि जो समाजासाठी एक धागेने जोडला जातो.च्पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मोदी यांनी भारत हा सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश असून येथे क्रीडा विकासाला अधिक वाव आहे. खेळाच्या पायाभूत सुविधा, औद्योगिकरण व क्रीडा साहित्य उत्पादनाचे केंद्र बनण्यासाठी आयओसी अध्यक्षांकडून पाठिंब्याची मागणी केली.