शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाकला घडवली अद्दल, भारताने केले सात सैनिक ठार; सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 11:29 IST

पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले

श्रीनगर : पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. पूंछ सेक्टरमध्ये भारताने ही कारवाई केली. याशिवाय सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आज सकाळी उल्लंघन करताच, भारतीय जवानांनी मेंढर सेक्टर भागात पाकच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार केला.पाकने राजोरी सेक्टरमध्ये शनिवारी केलेल्या गोळीबारात लान्स नायक योगेश भदाणे शहीद झाले होते. पाककडून सतत निष्कारण होणाºया गोळीबारामुळे भारतीय जवानही अस्वस्थ होते. त्यांनी आज पाकला सडेतोड धडा शिकवला. त्याआधी जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ते सारे जण पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, असे लष्कराच्या प्रवक्याने सांगितले.पाकने केले मान्यभारताने केलेल्या गोळीबारात चार सैनिक मरण पावल्याचे पाकिस्तानी सैन्याने मान्य केले आहे. मात्र तीन भारतीय जवानही या वेळी ठार झाले, असा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यांच्या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही.सहाव्या अतिरेक्याचा शोध सुरू : आम्ही घटनास्थळावरून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आमच्या मते सहा दहशतवादी ठार झाले आहेत. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.१५ जानेवारी हा भारतीय सैन्य दिन आहे. या दिवशी लष्करातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच हुतात्मा झालेल्या जवानांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. यानिमित्ताने लष्करप्रमुख जवानांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे भाषणही करतात. या वर्षी आजच्या दिवशीच भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.ही कारवाई उरी सेक्टरमध्ये करण्यात आली. जम्मू व काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी मिळून दहशतवाद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला.- एस.पी वैद, पोलीस महासंचालक, जम्मू-काश्मीरलष्करप्रमुख बिपीन रावतांचा पाकिस्तानला कठोर इशारानवी दिल्ली : पाकिस्तानने भाग पाडले तर दहशतवादी गटांविरोधातील आक्रमक उपाययोजना वाढवायला लष्कर तयार आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकला सोमवारी इशारा दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतविरोधातील कारवाया यशस्वी होऊ दिल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्ला