शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

पाकला घडवली अद्दल, भारताने केले सात सैनिक ठार; सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 11:29 IST

पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले

श्रीनगर : पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. पूंछ सेक्टरमध्ये भारताने ही कारवाई केली. याशिवाय सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आज सकाळी उल्लंघन करताच, भारतीय जवानांनी मेंढर सेक्टर भागात पाकच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार केला.पाकने राजोरी सेक्टरमध्ये शनिवारी केलेल्या गोळीबारात लान्स नायक योगेश भदाणे शहीद झाले होते. पाककडून सतत निष्कारण होणाºया गोळीबारामुळे भारतीय जवानही अस्वस्थ होते. त्यांनी आज पाकला सडेतोड धडा शिकवला. त्याआधी जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ते सारे जण पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, असे लष्कराच्या प्रवक्याने सांगितले.पाकने केले मान्यभारताने केलेल्या गोळीबारात चार सैनिक मरण पावल्याचे पाकिस्तानी सैन्याने मान्य केले आहे. मात्र तीन भारतीय जवानही या वेळी ठार झाले, असा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यांच्या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही.सहाव्या अतिरेक्याचा शोध सुरू : आम्ही घटनास्थळावरून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आमच्या मते सहा दहशतवादी ठार झाले आहेत. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.१५ जानेवारी हा भारतीय सैन्य दिन आहे. या दिवशी लष्करातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच हुतात्मा झालेल्या जवानांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. यानिमित्ताने लष्करप्रमुख जवानांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे भाषणही करतात. या वर्षी आजच्या दिवशीच भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.ही कारवाई उरी सेक्टरमध्ये करण्यात आली. जम्मू व काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी मिळून दहशतवाद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला.- एस.पी वैद, पोलीस महासंचालक, जम्मू-काश्मीरलष्करप्रमुख बिपीन रावतांचा पाकिस्तानला कठोर इशारानवी दिल्ली : पाकिस्तानने भाग पाडले तर दहशतवादी गटांविरोधातील आक्रमक उपाययोजना वाढवायला लष्कर तयार आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकला सोमवारी इशारा दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतविरोधातील कारवाया यशस्वी होऊ दिल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्ला