शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महागड्या खाद्यतेलापासून लवकरच मिळणार मोठा दिलासा; सरकार तयार करतंय खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:32 IST

Edible Oil : "युक्रेन आणि रशियामधील संघर्षानंतर भारत आता खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे."

नवी दिल्ली - खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने सरकार चिंतेत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन आणि रशियामधील संघर्षानंतर भारत आता खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे. भारत खाद्यतेलाचा मोठा भाग आयात करतो. सीतारामन यांच्या मते, दोन्ही देशांमधील संघर्षामुळे भारताला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे.

सीतारामन यांनी "रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, हे सर्वांना माहीत आहे. तेल आयात करताना अनेक अडचणी येतात. आपल्याला माहीत आहे की आपण खाद्यतेल आयात करू शकत नाही. आम्ही तिथून सूर्यफूल तेल घेत होतो." असं म्हटलं आहे. सरकार आता इतर अनेक बाजारातून खाद्यतेल आयात करत आहे आणि नवीन बाजारपेठांवर विचार करत आहे.

अर्थमंत्र्यांच्या मते, युक्रेन-रशिया संघर्षामुळे निर्यातीसाठी त्या बाजारपेठांमध्ये उद्योगपतींनाही संधी निर्माण झाली आहे. यापूर्वी युक्रेन आणि रशिया काही बाजारपेठांमध्ये निर्यात करत होते. आता त्यांची निर्यात होत नाही. त्या देशांमध्ये निर्यात करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. प्रत्येक आव्हानाचे संधीत रूपांतर करण्याची संधी उद्योगपतींनी पाहिली पाहिजे. केंद्र सरकार त्यांच्या पाठिंब्यासाठी सदैव तत्पर आहे.

इंडोनेशियाने निर्यातीवर घातली बंदी 

इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. कच्चे सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. त्याच वेळी सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियामधून आयात केले गेले आहे. खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा इंडोनेशियाचा निर्णय आणि इतर कारणांमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन