शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंतप्रधान मोदींनी ओढली लक्ष्मणरेषा, २०४७ पर्यंत भारत गाठणार मोठं लक्ष्य! काय म्हणाले PM वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये आयोजित ग्लोबल इनव्हेस्टर्स मीटमध्ये (Global Investors Meet) ते बोलत होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी देशातील गुंतवणूक महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असंही ते म्हणाले. 

भारतात गुंतवणूक करणं म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील गुंतवणूक, स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणं ठरणार आहे, असं मोदी म्हणाले. गुंतवणूक आणि मानव संसाधनांवर लक्ष्य केंद्रीत करुन विकासाची लक्ष्य गाठण्यासाठी खूप मोठी मदत होईल असं मोदींनी सांगितलं. 

स्टार्ट-अप इकोसिस्टमचं केलं कौतुकपंतप्रधान मोदींनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमबाबत बोलताना मुख्यत्वे कर्नाटक राज्याचं याबाबत कौतुक केलं. भारतातील १०० युनिकॉर्नमधील ४० तर एकट्या कर्नाटकातील आहेत. म्हणजेच त्यांचं मुख्यालय कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटक राज्य स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एक डबल इंजिन शक्ती आहे, असंही मोदी म्हणाले. भारताचं स्टार्टअप इकोसिस्टम जगात अमेरिका आणि चीनच्यानंतर नंतर जगात तिसऱ्या स्थानावर आहे. 

आद्योगिक क्रांतीत भारतीयांची महत्वाची भूमिका"मी गुंतवणुकदारांचं लक्ष मुख्यत्वे पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लानकडे केंद्रीत करू इच्छितो. या प्लाननं देशातील इन्फास्ट्रक्चरची निर्मितीची रुपरेषाच पूर्णपणे बदलली आहे. जग आज जेव्हा इंडस्ट्री ४.० च्या दिशेनं प्रवास करत आहे. यात औद्योगिक क्रांतीत भारतीय तरुणांची भूमिका आणि टॅलेंट पाहून जगही आश्चर्यचकीत झालं आहे", असं मोदी म्हणाले. 

८ वर्षात ८० हजार स्टार्टअप्सभारतात गेल्या ८ वर्षात ८० हजारहून अधिक स्टार्टअप्स तयार झाले आहेत. आज भारतातील प्रत्येक सेक्टर युवाशक्तीच्या ताकदीनं पुढे जात आहे. गेल्या वर्षी भारतानं रेकॉर्डब्रेक एक्सपोर्टची नोंद केली. कोरोनानंतरची परिस्थिती पाहता भारताची ही कामगिरी नक्कीच महत्वपूर्ण आहे, असंही मोदी म्हणाले. देशातील युवांच्या क्षमता वाढवण्यासाठी आम्ही इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये महत्वपूर्ण बदल केले. गेल्या काही वर्षात भारतात विद्यापीठं, टेक्नोलॉजी विद्यापीठं आणि मॅनेजमेंट विद्यापीठांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ केली आहे, असं मोदींनी सांगितलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी