शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 07:03 IST

President's Message To The Nation: जगाच्या अनेक भागांत वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे भविष्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने भारत जगात शांततेचा संदेश देत आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली -  जगाच्या अनेक भागांत वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे भविष्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने भारत जगात शांततेचा संदेश देत आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. ७७ व्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूर, महिला सक्षमीकरण यांसह वंदे मातरम तसेच वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले.

प्राचीन संस्कृतीच्या बांधिलकीच्या आधारे जागतिक ऐक्य साधण्याच्या दृष्टीने भारताचे ‘शांततेचा दूत’ म्हणून असलेले स्थान राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. संपूर्ण विश्वात शांतता नांदावी म्हणून भारतीय परंपरेत आपण नेहमीच प्रार्थना करीत आलो आहोत. संपूर्ण जगात अशी शांतता नांदली तरच मानवी जीवनाचे भविष्य सुरक्षित राहील, असे त्या म्हणाल्या.

गरिबी निर्मूलनात भारताची कामगिरी आणि ८१ कोटी लाभार्थ्यांना विविध योजनांचा दिला जात असलेला लाभ महत्त्वाचा ठरत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. ‘विकसित भारत’ हा सर्वसमावेशक असला पाहिजे, असे सांगून आदिवासी व उपेक्षित घटकांना केंद्र मानून हा विकास व्हायला हवा, असे मुर्मू यांनी नमूद केले.

राष्ट्रवादाला चालना१. भारतीय संविधान आता आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध असलेल्या सर्व २२ भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगून संवैधानिक राष्ट्रवादाला चालना या देशाच्या दृष्टीने मैलाचा दगड असल्याचे त्या म्हणाल्या. आता भारतीय नागरिक आपल्या मातृभाषेत देशाच्या पायाभूत दस्तऐवजाशी जोडला गेला असल्याचे मुर्मू यांनी नमूद केले.२. भारतीय लोक विवेकाबुद्धीने प्रलोभनांपासून दूर राहून कोणताही पूर्वग्रह न बाळगता मतदान करतील, अशी अपेक्षा मुर्मू यांनी व्यक्त केली. चुकीच्या माहितीपासून दूर राहून हे लोक मतदानाचा अधिकार वापरतील, असेही त्या म्हणाल्या.

या मुद्द्यांचा केला उल्लेख- ऑपरेशन सिंदूरद्वारे सीमापार दहशतवादाचे कंबरडे मोडून राष्ट्रीय सुरक्षेबाबतची वचनबद्धता भारताने सिद्ध केली.- संरक्षण क्षेत्रातील आपल्या स्वावलंबनामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठे यश मिळाले.- समस्त भारतीयांचा सेना, हवाई दल, नौदल अशा तिन्ही दलांवर व त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असल्याचा विशेष उल्लेख.- २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीने उदयास आलेल्या नारी शक्तीचे कौतुक केले.- ग्रामीण बचतगटांपासून अवकाश क्षेत्रातील महिलांचा गौरव त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : India, a messenger of peace for a conflict-ridden world: President

Web Summary : President Murmu, on Republic Day eve, highlighted India's role as a peace messenger amidst global tensions. She emphasized national unity, women's empowerment, and economic growth, praising the armed forces and urging responsible voting while focusing on the importance of national security through initiatives like Operation Sindoor.
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२६Draupadi Murmuद्रौपदी मुर्मू