शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात, अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:42 IST

‘जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा भक्कम असला तरीही वाढत्या ‘विभाजन’ आणि ‘ध्रुवीकरण’मुळे देशाच्या विकासाचा ‘पाया’ खराब होत आहे. भारतात सध्या सर्वांत मोठे आव्हान बेरोजगारी आहे. बेरोजगारी दर २४ टक्क्यांच्यावर पोहोचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी मंगळवारी सांगितले.

कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नाही. राष्ट्राच्या आर्थिक यशामध्ये लोकांमधील विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारतीय समाजात विभाजन आणि ध्रुवीकरण वाढत आहे. हे केवळ खेदजनकच नाही तर देशाच्या विकासाच्या पायालाही हानी पोहोचवत आहे, असे अर्थतज्ज्ञ बसू यांनी म्हटले आहे. बसू यांच्या मते, मोठा उद्योजक वर्ग, अधिक कुशल कामगार आणि जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) गुणोत्तरामध्ये जास्त गुंतवणूक यामुळे भारताचा पाया मजबूत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कुशल कामगारांची संख्या कमी होत आहे. त्याचा फटका देशाला बसू शकतो.भारतातील महागाईचे कारण जागतिक आहे. कोरोना महामारी आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने महागाई वाढली आहे. हे भारताच्या नियंत्रणात नसले तरीही गरीब आणि मध्यमवर्गीयांना यापासून वाचविण्यासाठी कोणतीही पुरेशी पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

लहान व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांना थेट मदत द्या!देशात किरकोळ महागाईत मोठी वाढ झाली आहे. आपण गेल्या २४ वर्षांत महागाई वाढल्याचे पाहिले नाही. सध्या जे काही होत आहे ते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धाची आठवण करून देत आहे. त्यावेळी पूर्व आशियाई संकटाचा परिणाम भारतात होऊ लागला होता. महागाई आणखी वाढत जाणार असून, सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत. लहान व्यापारी, कामगार आणि शेतकऱ्यांना थेट आणि तातडीची मदत देण्याची गरज असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाjobनोकरीUnemploymentबेरोजगारी