शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात, अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 06:42 IST

‘जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा भक्कम असला तरीही वाढत्या ‘विभाजन’ आणि ‘ध्रुवीकरण’मुळे देशाच्या विकासाचा ‘पाया’ खराब होत आहे. भारतात सध्या सर्वांत मोठे आव्हान बेरोजगारी आहे. बेरोजगारी दर २४ टक्क्यांच्यावर पोहोचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी मंगळवारी सांगितले.

कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नाही. राष्ट्राच्या आर्थिक यशामध्ये लोकांमधील विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारतीय समाजात विभाजन आणि ध्रुवीकरण वाढत आहे. हे केवळ खेदजनकच नाही तर देशाच्या विकासाच्या पायालाही हानी पोहोचवत आहे, असे अर्थतज्ज्ञ बसू यांनी म्हटले आहे. बसू यांच्या मते, मोठा उद्योजक वर्ग, अधिक कुशल कामगार आणि जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) गुणोत्तरामध्ये जास्त गुंतवणूक यामुळे भारताचा पाया मजबूत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कुशल कामगारांची संख्या कमी होत आहे. त्याचा फटका देशाला बसू शकतो.भारतातील महागाईचे कारण जागतिक आहे. कोरोना महामारी आणि युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने महागाई वाढली आहे. हे भारताच्या नियंत्रणात नसले तरीही गरीब आणि मध्यमवर्गीयांना यापासून वाचविण्यासाठी कोणतीही पुरेशी पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

लहान व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांना थेट मदत द्या!देशात किरकोळ महागाईत मोठी वाढ झाली आहे. आपण गेल्या २४ वर्षांत महागाई वाढल्याचे पाहिले नाही. सध्या जे काही होत आहे ते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धाची आठवण करून देत आहे. त्यावेळी पूर्व आशियाई संकटाचा परिणाम भारतात होऊ लागला होता. महागाई आणखी वाढत जाणार असून, सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत. लहान व्यापारी, कामगार आणि शेतकऱ्यांना थेट आणि तातडीची मदत देण्याची गरज असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाjobनोकरीUnemploymentबेरोजगारी