शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत पाकिस्तानच्या हल्ल्याचा अनेकदा घेतला आहे भारताने बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 07:57 IST

उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती.

सुरेश एस डुग्गर

जम्मू : पहलगाम नरसंहारानंतर भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून ‘हल्ला’ करण्याची तयारी करत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. उरी हल्ल्यानंतर केलेली कारवाईही पहिली कारवाई नव्हती. कारगिल युद्धानंतर भारतीय सैन्याला अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडण्यास भाग पाडले गेले; परंतु हे  इतके गुप्तपणे पार पडले की, आजही भारतीय सैन्य अशा कारवायांवर मौन बाळगत आहे.

उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती. याआधीही, कारगिल युद्धानंतर, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैनिकांना मारले किंवा त्यांनी पाठवलेल्या दहशतवाद्यांनी देशात लोकांना मारले, त्या त्यावेळी भारतीय सैन्याने अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडली होती. उरी घटनेतील एकमेव विशेष गोष्ट म्हणजे, भारतीय सैन्याने पहिल्यांदाच  नियंत्रण रेषा ओलांडल्याचे मान्य केले.

त्यांचेही तितकेच नुकसान

पाक सैन्याने दहशतवाद्यांची मदत घेत भारतीय सैनिकांना नुकसान पोहोचवले. त्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई झाली, तेव्हा भारतीय सैन्यानेही नियंत्रण रेषा ओलांडली. पाक सैन्याचेही नुकसान केले

पाकने नेमक्या काय खोड्या केल्या होत्या?

१४ मे २००२ रोजी कालू चक येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या नरसंहारात ३४ लोक मारले गेले.

मृतांमध्ये सैनिकांच्या महिला आणि मुलांचा समावेश होता. २०१३ मध्ये दोन घटना घडल्या. एक ६ ऑगस्ट रोजी आणि दुसरी ८ जानेवारी रोजी.

एका घटनेत पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांना मारले आणि दुसऱ्या प्रकरणात पाकिस्तानी सैनिकांनी हेमराज यांचे शिर वेगळे करत सोबत नेले. यामुळे भारतीय सैन्यात संताप उसळला आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला जोरदार उत्तर दिले होते.

पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान केव्हा झाले?

सूत्रांच्या माहितीनुसार, कालू चक नरसंहार, नाईक हेमराज सिंग यांचा शिरच्छेद करणे आणि ऑगस्ट २०१३ मध्ये सीमा चौकी ताब्यात घेताना पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांची हत्या केल्याच्या घटनांमध्ये भारतीय सैन्याने पाकचे सर्वाधिक नुकसान केले.

...म्हणून भारतीय सैन्याला मिळाली नवी ओळख

भारताने हल्ल्यांचा बदला घेतला. मात्र तरीही असे मानले जात नव्हते की प्रत्युत्तर म्हणून नियंत्रण रेषा ओलांडली गेली; पण उरीची घटना ही अशी पहिलीच घटना होती जिथे भारतीय सैन्याने अधिकृतपणे मान्य केले की, सैनिक नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्य आणि दहतशवाद्यांना यमसदनी धाडले होते.

यामुळे भारतीय सैन्याची ओळख ‘आक्रमक सैन्य’ म्हणून झाली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर