शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

आतापर्यंत पाकिस्तानच्या हल्ल्याचा अनेकदा घेतला आहे भारताने बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 07:57 IST

उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती.

सुरेश एस डुग्गर

जम्मू : पहलगाम नरसंहारानंतर भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून ‘हल्ला’ करण्याची तयारी करत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. उरी हल्ल्यानंतर केलेली कारवाईही पहिली कारवाई नव्हती. कारगिल युद्धानंतर भारतीय सैन्याला अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडण्यास भाग पाडले गेले; परंतु हे  इतके गुप्तपणे पार पडले की, आजही भारतीय सैन्य अशा कारवायांवर मौन बाळगत आहे.

उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती. याआधीही, कारगिल युद्धानंतर, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैनिकांना मारले किंवा त्यांनी पाठवलेल्या दहशतवाद्यांनी देशात लोकांना मारले, त्या त्यावेळी भारतीय सैन्याने अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडली होती. उरी घटनेतील एकमेव विशेष गोष्ट म्हणजे, भारतीय सैन्याने पहिल्यांदाच  नियंत्रण रेषा ओलांडल्याचे मान्य केले.

त्यांचेही तितकेच नुकसान

पाक सैन्याने दहशतवाद्यांची मदत घेत भारतीय सैनिकांना नुकसान पोहोचवले. त्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई झाली, तेव्हा भारतीय सैन्यानेही नियंत्रण रेषा ओलांडली. पाक सैन्याचेही नुकसान केले

पाकने नेमक्या काय खोड्या केल्या होत्या?

१४ मे २००२ रोजी कालू चक येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या नरसंहारात ३४ लोक मारले गेले.

मृतांमध्ये सैनिकांच्या महिला आणि मुलांचा समावेश होता. २०१३ मध्ये दोन घटना घडल्या. एक ६ ऑगस्ट रोजी आणि दुसरी ८ जानेवारी रोजी.

एका घटनेत पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांना मारले आणि दुसऱ्या प्रकरणात पाकिस्तानी सैनिकांनी हेमराज यांचे शिर वेगळे करत सोबत नेले. यामुळे भारतीय सैन्यात संताप उसळला आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला जोरदार उत्तर दिले होते.

पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान केव्हा झाले?

सूत्रांच्या माहितीनुसार, कालू चक नरसंहार, नाईक हेमराज सिंग यांचा शिरच्छेद करणे आणि ऑगस्ट २०१३ मध्ये सीमा चौकी ताब्यात घेताना पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांची हत्या केल्याच्या घटनांमध्ये भारतीय सैन्याने पाकचे सर्वाधिक नुकसान केले.

...म्हणून भारतीय सैन्याला मिळाली नवी ओळख

भारताने हल्ल्यांचा बदला घेतला. मात्र तरीही असे मानले जात नव्हते की प्रत्युत्तर म्हणून नियंत्रण रेषा ओलांडली गेली; पण उरीची घटना ही अशी पहिलीच घटना होती जिथे भारतीय सैन्याने अधिकृतपणे मान्य केले की, सैनिक नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्य आणि दहतशवाद्यांना यमसदनी धाडले होते.

यामुळे भारतीय सैन्याची ओळख ‘आक्रमक सैन्य’ म्हणून झाली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर