शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

आतापर्यंत पाकिस्तानच्या हल्ल्याचा अनेकदा घेतला आहे भारताने बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 07:57 IST

उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती.

सुरेश एस डुग्गर

जम्मू : पहलगाम नरसंहारानंतर भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून ‘हल्ला’ करण्याची तयारी करत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. उरी हल्ल्यानंतर केलेली कारवाईही पहिली कारवाई नव्हती. कारगिल युद्धानंतर भारतीय सैन्याला अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडण्यास भाग पाडले गेले; परंतु हे  इतके गुप्तपणे पार पडले की, आजही भारतीय सैन्य अशा कारवायांवर मौन बाळगत आहे.

उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती. याआधीही, कारगिल युद्धानंतर, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैनिकांना मारले किंवा त्यांनी पाठवलेल्या दहशतवाद्यांनी देशात लोकांना मारले, त्या त्यावेळी भारतीय सैन्याने अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडली होती. उरी घटनेतील एकमेव विशेष गोष्ट म्हणजे, भारतीय सैन्याने पहिल्यांदाच  नियंत्रण रेषा ओलांडल्याचे मान्य केले.

त्यांचेही तितकेच नुकसान

पाक सैन्याने दहशतवाद्यांची मदत घेत भारतीय सैनिकांना नुकसान पोहोचवले. त्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई झाली, तेव्हा भारतीय सैन्यानेही नियंत्रण रेषा ओलांडली. पाक सैन्याचेही नुकसान केले

पाकने नेमक्या काय खोड्या केल्या होत्या?

१४ मे २००२ रोजी कालू चक येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या नरसंहारात ३४ लोक मारले गेले.

मृतांमध्ये सैनिकांच्या महिला आणि मुलांचा समावेश होता. २०१३ मध्ये दोन घटना घडल्या. एक ६ ऑगस्ट रोजी आणि दुसरी ८ जानेवारी रोजी.

एका घटनेत पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांना मारले आणि दुसऱ्या प्रकरणात पाकिस्तानी सैनिकांनी हेमराज यांचे शिर वेगळे करत सोबत नेले. यामुळे भारतीय सैन्यात संताप उसळला आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला जोरदार उत्तर दिले होते.

पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान केव्हा झाले?

सूत्रांच्या माहितीनुसार, कालू चक नरसंहार, नाईक हेमराज सिंग यांचा शिरच्छेद करणे आणि ऑगस्ट २०१३ मध्ये सीमा चौकी ताब्यात घेताना पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांची हत्या केल्याच्या घटनांमध्ये भारतीय सैन्याने पाकचे सर्वाधिक नुकसान केले.

...म्हणून भारतीय सैन्याला मिळाली नवी ओळख

भारताने हल्ल्यांचा बदला घेतला. मात्र तरीही असे मानले जात नव्हते की प्रत्युत्तर म्हणून नियंत्रण रेषा ओलांडली गेली; पण उरीची घटना ही अशी पहिलीच घटना होती जिथे भारतीय सैन्याने अधिकृतपणे मान्य केले की, सैनिक नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्य आणि दहतशवाद्यांना यमसदनी धाडले होते.

यामुळे भारतीय सैन्याची ओळख ‘आक्रमक सैन्य’ म्हणून झाली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर