शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

भारताचा एकही शत्रू नाही... पाकिस्तान, चीन आहेत तरी कोण ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:46 IST

पाकिस्तानसोबत भारताचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. तर दुसरीकडे डोकलामच्या मुद्यावरून चीनकडूनदेखील युद्धाची भाषा करण्यात येत आहे. या देशांतील अनेक नेते भारताला

- परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे माहितीच नाही नागपूर, दि. 7 - पाकिस्तानसोबत भारताचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. तर दुसरीकडे डोकलामच्या मुद्यावरून चीनकडूनदेखील युद्धाची भाषा करण्यात येत आहे. या देशांतील अनेक नेते भारताला शत्रूराष्ट्र मानतात. मात्र भारताच्या लेखी बहुतेक जगातील एकही राष्ट्र शत्रूराष्ट्र नाही. म्हणूनच की काय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे यासंदर्भात माहितीच उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आले आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे विचारणा केली होती. कुठले देश शत्रूराष्ट्राच्या यादीत आहेत आणि त्यांचा समावेश कधीपासून करण्यात आला आहे, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून विविध देशांबाबत उत्तर देण्यात आली. मात्र बहुतांश उत्तरांत संबंधित माहिती उपलब्ध नाही किंवा ‘निरंक’ असे नमूद करण्यात आले आहे. अगदी पाकिस्तान, चीनसंदर्भातदेखील असेच उत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे की नाही, याची मंत्रालयाकडे माहिती नाही. तर चीनबाबत ‘निरंक’ असे उत्तर देण्यात आले आहे. बांगलादेशबाबतदेखील काहीच माहिती नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाºया दहशतवादी कारवाया, भारतातील नेत्यांनी उघडपणे दिलेला इशारा, चीनशी ताणले गेलेले संबंध व तेथील सैन्य आणि नेत्यांकडून येणाºया धमक्या या पार्श्वभूमीवरदेखील ही शत्रूराष्ट्र आहेत की नाही, याची माहिती नाही ही बाब बुचकळ््यात टाकणारी आहे. आखाती राष्ट्रांत एकही शत्रू नाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरात बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, ब्रुनेई, इंडोनेशिया, तिमोर यांच्याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर भूतान, म्यानमार, चीन ही शत्रूराष्ट्रं आहेत की नाही, याचे उत्तर ‘निरंक’ असे देण्यात आले आहे. आखाती राष्ट्रांत मात्र देशाचा एकही शत्रू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर अमेरिका व कॅनडा यांच्याशी अतिशय चांगले संबंध असल्याचे उत्तर देण्यात आले आहे.