शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

भारताने 10 वेळा केले सर्जिकल स्ट्राइक्स

By admin | Updated: October 7, 2016 01:52 IST

काही आठवड्यांपूर्वी भारताने केलेल्या पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सबाबत शंकाकुशंका निर्माण केल्या जात असतानाच, यापूर्वीही गेल्या अठरा वर्षांमध्ये भारताने दहा वेळा

नवी दिल्ली-  काही आठवड्यांपूर्वी भारताने केलेल्या पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सबाबत शंकाकुशंका निर्माण केल्या जात असतानाच, यापूर्वीही गेल्या अठरा वर्षांमध्ये भारताने दहा वेळा पाकिस्तानात घुसून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यातील एकही कारवाई भारत सरकारने या वेळसारखी जगजाहीर केली नव्हती. मात्र, भारत हल्ले करत असल्याचा कांगावा अनेक वेळा करून पाकिस्ताननेच याचे पुरावे जगासमोर आणले होते. अठरा वर्षांपूर्वी मे १९९८ मध्ये पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे भारताने आमच्या भूमित येऊन हल्ला केल्याचा कांगावा केला होता. भारताने आमच्या २२ सैनिकांना ठार मारल्याचे पाकने म्हटले होते, शिवाय भारतीय सैनिकांनी आमच्या हद्दीत धमक्यांचे पत्र सोडले होते, असेही पाकने म्हटले होते. भारताने हा हल्ला केला होता. कारण आठवडाभरापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीतील पठाणकोट आणि ढाकीकोट भागातील २६ नागरिकांचा जीव घेतला होता. कारगिल युद्ध सुरू होते, त्या वेळी म्हणजेच १९९९ साली भारतीय सैनिकांनी जम्मूतील नियंत्रणरेषा पार करून पाक सैनिकांवर हल्ला चढविला होता.वर्षभराने म्हणजे २००० साली भारतीय सैन्याने पाकिस्तानातील नीलम नदी परिसरात जाऊन सात पाक सैनिकांना ठार मारल्याचा कांगावा पाकनेच केला होता. काही दिवसांपूर्वीच भारताच्या जाट रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया आणि पाच सैनिक पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने सीमा ओलांडून हल्ला चढविला. मार्च २००० मध्ये भारताच्या इन्फन्ट्री बटालियनच्या जवानांनी नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केले. कारण या हल्ल्याच्या आठवडाभरापूर्वीच पाकने भारतीय जवानांना लक्ष्य केले होते. भारताच्या इन्फन्ट्री बटालियनच्या या कॅप्टनला नंतर शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांनी २० मार्च २००० रोजी अनंतनाग जिल्ह्यातील छत्तीसिंगपोरा येथे हल्ला करून ३५ शिखांची हत्या केली. त्यानंतर, लगेच काही आठवड्यांनी भारतीय लष्कराच्या विशेष दलाच्या नवव्या तुकडीने सीमापार मोठे आॅपरेशन राबविले होते. या आॅपरेशनला वाजपेयी सरकारनेच परवानगी दिली होती आणि त्यात २८ पाक सैनिक व अनेक दहशतवादी यमसदनी धाडण्यात आले होते.भारतीय सैनिकांनी १८ सप्टेंबर २००३ रोजी बोराह सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानी चौकीवर हल्ला करून एक अधिकारी आणि तीन सनिकांनी मारल्याचा कांगावा पाकनेच केला होता.भारताने हल्ला करून चार पाकिस्तानी सैनिकांना मारल्याची तक्रार पाकने जून 2008मध्ये केली होती.भारतीय सैन्याने ३० आॅगस्ट २०११ रोजी शारदा सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला करून, तीन सैनिक मारल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. जानेवारी २०१३ मध्ये सवान पत्रा भागातील चौकीवर भारताने हल्ला केल्याचे पाकने म्हटले होते.२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ३५ हून अधिक अतिरेकी ठार मारले, तर अनेक पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले.

पीओकेमधील रहिवासी म्हणतात, ‘आमचे जगणे नरक!’पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या वाढत जाणाऱ्या तळांमुळे आमचे दैनंदिन जगणे नरकासमान बनले आहे, अशी व्यथा तेथील रहिवाशांनी बोलून दाखविली. ही व्यथा पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, चिनारी, मिरपूर, गिलगिट, दियामेर आणि नीलम खोरे येथील रहिवाशांनी गुरुवारी येथे पाकिस्तान सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली, तेव्हा बोलून दाखविली.