शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

५ कोटी बेरोजगार घरी बसून; लोकांची अवस्था होतेय गंभीर; १८.७५ कोटी तरुण नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 06:13 IST

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात बेरोजगार झालेल्यांची संख्या ५.३ कोटींवर गेली आहे. यात महिलांची संख्या १.७ कोटी आहे.

नवी दिल्ली : भारतासारख्या विकसनशील देशासमोर सध्या बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे त्यात आणखी भर पडली आहे. एका नव्या अहवालानुसार देशातील बेरोजगारांची संख्या ५ कोटींपेक्षा अधिक झाली असून, यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात बेरोजगार झालेल्यांची संख्या ५.३ कोटींवर गेली आहे. यात महिलांची संख्या १.७ कोटी आहे. नोकरी गेल्याने बसून असणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असून, त्या सतत नोकरी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, सतत काम शोधूनही नोकरीची संधी मिळत नसल्याने घरी बसून असणाऱ्यांचा कोट्यवधी तरुणांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.शोधाशोध करूनही मिळेना नोकरीअहवालानुसार, एकूण ५.३ कोटी बेरोजगारांपैकी ३.५ कोटी लोक सतत कामाच्या शोधात बाहेर पडत आहेत. यामध्ये जवळपास ८० लाख महिलांचा समावेश आहे. इतर १.७ कोटी बेरोजगारांची काम करण्याची इच्छा आहे, मात्र ते त्यासाठी म्हणावे तितके प्रयत्न करताना दिसत नाहीत. यामध्ये ५३ टक्के म्हणजे ९० लाख महिलांचा समावेश आहे. भारतात सध्या नोकरी मिळणे अतिशय अवघड झाले असून, ही एक मोठी समस्या झाली आहे, असे सीएमआयईने म्हटले आहे.आकडेवारी बोलते...एकूण बेरोजगार : ५.३ कोटीमहिला बेरोजगार : १.७ कोटीनोकरी शोधण्यासाठी रोज बाहेर पडणारे : ३.५ कोटीमहिलांची संख्या : ८० लाखभारत जागतिक दर्जाच्या खालीजागतिक बँकेच्या अंदाजानुसार, जागतिक स्तरावर नोकरी मिळण्याचा दर कोरोना महामारीच्या अगोदर ५८ टक्के होता, तो कोरोना आल्यानंतर कमी झाला आहे. २०२० मध्ये जगभरात ५५ टक्के लोकांना नोकरी मिळत असताना भारतात मात्र, केवळ ४३ टक्के लोकच नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले.  सध्या भारतात केवळ ३८ टक्के लोकांनाच रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.महिलांना कमी संधीभारताला समृद्ध अर्थव्यवस्था बनविण्यासाठी देशातील जवळपास ६० टक्के लोकसंख्येला रोजगार देणे आवश्यक आहे. जागतिक दर्जा मिळविण्यासाठी देशात सध्या १८.७५ कोटी नागरिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. याच्यासह कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा हिस्साही वाढविण्याची गरज असल्याचे सीएमआयईने म्हटले आहे.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी