शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

५ कोटी बेरोजगार घरी बसून; लोकांची अवस्था होतेय गंभीर; १८.७५ कोटी तरुण नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 06:13 IST

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात बेरोजगार झालेल्यांची संख्या ५.३ कोटींवर गेली आहे. यात महिलांची संख्या १.७ कोटी आहे.

नवी दिल्ली : भारतासारख्या विकसनशील देशासमोर सध्या बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे त्यात आणखी भर पडली आहे. एका नव्या अहवालानुसार देशातील बेरोजगारांची संख्या ५ कोटींपेक्षा अधिक झाली असून, यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात बेरोजगार झालेल्यांची संख्या ५.३ कोटींवर गेली आहे. यात महिलांची संख्या १.७ कोटी आहे. नोकरी गेल्याने बसून असणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असून, त्या सतत नोकरी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, सतत काम शोधूनही नोकरीची संधी मिळत नसल्याने घरी बसून असणाऱ्यांचा कोट्यवधी तरुणांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.शोधाशोध करूनही मिळेना नोकरीअहवालानुसार, एकूण ५.३ कोटी बेरोजगारांपैकी ३.५ कोटी लोक सतत कामाच्या शोधात बाहेर पडत आहेत. यामध्ये जवळपास ८० लाख महिलांचा समावेश आहे. इतर १.७ कोटी बेरोजगारांची काम करण्याची इच्छा आहे, मात्र ते त्यासाठी म्हणावे तितके प्रयत्न करताना दिसत नाहीत. यामध्ये ५३ टक्के म्हणजे ९० लाख महिलांचा समावेश आहे. भारतात सध्या नोकरी मिळणे अतिशय अवघड झाले असून, ही एक मोठी समस्या झाली आहे, असे सीएमआयईने म्हटले आहे.आकडेवारी बोलते...एकूण बेरोजगार : ५.३ कोटीमहिला बेरोजगार : १.७ कोटीनोकरी शोधण्यासाठी रोज बाहेर पडणारे : ३.५ कोटीमहिलांची संख्या : ८० लाखभारत जागतिक दर्जाच्या खालीजागतिक बँकेच्या अंदाजानुसार, जागतिक स्तरावर नोकरी मिळण्याचा दर कोरोना महामारीच्या अगोदर ५८ टक्के होता, तो कोरोना आल्यानंतर कमी झाला आहे. २०२० मध्ये जगभरात ५५ टक्के लोकांना नोकरी मिळत असताना भारतात मात्र, केवळ ४३ टक्के लोकच नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले.  सध्या भारतात केवळ ३८ टक्के लोकांनाच रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.महिलांना कमी संधीभारताला समृद्ध अर्थव्यवस्था बनविण्यासाठी देशातील जवळपास ६० टक्के लोकसंख्येला रोजगार देणे आवश्यक आहे. जागतिक दर्जा मिळविण्यासाठी देशात सध्या १८.७५ कोटी नागरिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. याच्यासह कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा हिस्साही वाढविण्याची गरज असल्याचे सीएमआयईने म्हटले आहे.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी