शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारताकडे सर्जिकल स्ट्राईकशिवाय पर्याय नव्हता

By admin | Updated: September 29, 2016 19:28 IST

पाकिस्तानच्या कुरापती लक्षात घेतल्या तर भारताला सर्जिकल स्ट्राईक शिवाय कोणताही पर्याय नव्हता.

- दत्तात्रय शेकटकर

पाकिस्तानच्या कुरापती लक्षात घेतल्या तर भारताला सर्जिकल स्ट्राईक शिवाय कोणताही पर्याय नव्हता. पाकिस्तानच्या सैन्याला व दहशतवाद्यांना धडा शिकवायला होता. पाकिस्तानच्या कँपवर आपल्या गुप्तचर यंत्रणा गेल्या सात दिवसांपासून लक्ष ठेवून होत्या. त्यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी भारतीय सीमेजवळ आले होते व त्यांचा भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता. ही माहिती आपल्याकडे असल्याने त्यांच्यावर तातडीने हल्ला करण्याची गरज होती. त्यामुळे ताबडतोब जाऊन हल्ला करा असे आदेश देण्यात आले त्यानुसार ही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. अशा परिस्थितीत सैन्याने २४/७ दक्ष राहणे गरजेचे असते. त्यानुसार भारतीय सैन्याने ही कारवाई केली. १९७१ नंतर मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली सैन्यदलाने हे धाडस दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा धाडसी निर्णय घेतला. भारतीय सैन्यदलाचेही अभिनंदन करावे असे हे पाऊल आहे. देशातील प्रत्येकाला या धाडसी कारवाईचा अभिमान असायला हवा. पुन्हा भारताला ही कारवाई करायला भाग पाडू नका हा स्पष्ट संदेश या कारवाईतून पाकिस्तानला गेलेला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई होती. त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सैनिकांच्या विरोधात होती. परंतु एकही निरपराध माणूस त्यात मारला गेलेला नाही हे खरे रणकौशल्य आहे. भारतीय सैन्याला योग्य पाठबळ, स्वातंत्र्य आणि मुभा मिळाली तर ते वाट्टेल ते करू शकते हे यातून दिसून आले आहे. यापूर्वी पर्यंत दहशतवादी भारतात घुसल्यानंतर त़्यांचा शोध घेतला जायचा व त्यामध्ये भारताचे खूप नुकसान त्यांनी केलेले असायचे परंतु आता ते सीमेतून आत घुसण्यापूर्वीच त्यांना मारण्याची भूमिका भारताने घेतली आहे. हे खऱ्या अर्थाने नितीपरिवर्तन आहे. या पूर्वीच्या शासनाने ही भूमिका घेतली असती तर देशाची कमी नुकसान झाले असते. पाकिस्तान या कारवाई नंतर शांत बसणार नाही. त्यामुळे संपूर्ण राष्ट्राने यापुढे सावध असायला हवे. राष्ट्रीय एकात्मका आत्ताच खरे तर दिसायला हवी. त्यात राजकारण, मतभेद यांना थारा देऊ नये. पाकिस्तान नक्की काहीतरी करेल हे गृहीत धरून मतभेद विसरून एकदिलाने पाकिस्तानचा धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे. परत कोणत्याही राष्ट्राची आपल्याकडे मान वाकडी करून पाहण्याची हिंमत होऊ नये असा आपला दरारा असायला हवा. पाकिस्तानला आत्महत्याच करायची असेल तरच ते भारताविरोधात युद्ध पुकारतील. जेव्हा सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई केली जाते तेव्हा सर्व प्रकारची तयारी अगोदरच केलेली असते. आपली तिन्ही दले त्यादृष्टीने सज्ज असणार आहेत. भारताला युद्ध नको आहे परंतु ते झालेच तर पाकिस्तानला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल हे मात्र नक्की

(लेखक निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत. पाकिस्तान, चीन या देशांच्या संदर्भात त्यांचा अतिशय गाढा अभ्यास असून महत्त्वाच्या अनेक संरक्षण समित्यांवर ते कार्यरत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षितता हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. काश्मीर खोऱ्यातही त्यांनी प्रदीर्घकाळ काम केलेले आहे.)