शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

भारताने 46 टन सोने गहाण ठेवले होते, RBIच्या माजी गव्हर्नरने केला 1991 सालचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:41 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांनी त्यांच्या पुस्तकातून हा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली: भारताच्या इतिहासात आर्थिक सुधारणांच्या दृष्टिकोनातून 1991 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था खुली नव्हती. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या पुस्तकातून 1991 आणि त्यानंतरच्या संदर्भात अनेक मोठ्या गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यांच्या The Road: My Days At RBI and Beyond या पुस्तकात त्यांनी त्या काळातील परिस्थितीबद्दल सांगितले आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांनी लिहिले की, आम्हाला (भारताला) पैसे उभारण्यासाठी विविध मार्गांचा विचार करावा लागला. मग परदेशात सोने गहाण ठेवून पैसे उभे करायचे ठरवले. तेव्हा आम्ही 46 टन सोने परदेशात गहाण ठेवले होते. मुंबई विमानतळावरुन चार्टर विमानाने सोने इंग्लंडला गेले, त्याबदल्यात सूमारे $500 मिलियन मिळाले. आज ही रक्कम खूपच कमी वाटू शकते. पण, त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. विमानातून सोने परदेशात पाठवणे, हा दु:खद अनुभव होता.

पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी सुचली?रंगराजन सांगतात की, पुस्तक लिहिण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. 2014 मध्ये केंद्रात सरकार बदलल्यानंतर मी दिल्ली सोडली. मग मला वाटले की हीच योग्य वेळ आहे. तेव्हा माझ्या मनात काही शंका आल्या. रिझर्व्ह बँकेतील माझ्या कार्यकाळातील सर्व घटनांबद्दल लिहिणे शक्य नव्हते. मग, मी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला.

आजची महागाई, भूतकाळातील निर्णयांमुळेसी. रंगराजन म्हणतात की, राजकोषीय धोरण आणि चलनविषयक कठोरपणा यांच्यातील संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतील. काही प्रमाणात असे म्हणता येईल की, आज आपण जी महागाई पाहत आहोत, ती आपण आधी घेतलेल्या काही निर्णयांमुळे आहे. कोरोनाची लाट शिगेला असताना सर्वांनी सरकारला खर्च वाढवण्याचा सल्ला दिला होता. सरकारचा महसूल कमी होत असताना, हा निर्णय घ्यावा लागला. याचा परिणाम काय झाला? आणखी कर्ज घ्यावे लागले. 

रुपयावर काय म्हणाले?माजी गव्हर्नर म्हणतात की, भारतीय रुपयाबद्दल बोलायचे झाले तर, फंड्स देशातून अमेरिकेत जात आहेत. कारण तिथे इंटरेस्ट रेट जास्त आहेत. यामुळे रुपयाची व्हॅल्यू घसरत आहे. पण, आता हळुहळू रुपया सावरत आहा. याचे कारण म्हणजे, फंड्स बाहेर जाणे थांबले किंवा कमी झाले आहे. आता बाहेरुन फंड्स येणे सुरू झाले आहे. भारताच्या मॉनेटरी पॉलिसीने त्यावरही लक्ष देणे सुरू करायला हवे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकार