शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

भारताने 46 टन सोने गहाण ठेवले होते, RBIच्या माजी गव्हर्नरने केला 1991 सालचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:41 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांनी त्यांच्या पुस्तकातून हा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली: भारताच्या इतिहासात आर्थिक सुधारणांच्या दृष्टिकोनातून 1991 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था खुली नव्हती. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या पुस्तकातून 1991 आणि त्यानंतरच्या संदर्भात अनेक मोठ्या गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यांच्या The Road: My Days At RBI and Beyond या पुस्तकात त्यांनी त्या काळातील परिस्थितीबद्दल सांगितले आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांनी लिहिले की, आम्हाला (भारताला) पैसे उभारण्यासाठी विविध मार्गांचा विचार करावा लागला. मग परदेशात सोने गहाण ठेवून पैसे उभे करायचे ठरवले. तेव्हा आम्ही 46 टन सोने परदेशात गहाण ठेवले होते. मुंबई विमानतळावरुन चार्टर विमानाने सोने इंग्लंडला गेले, त्याबदल्यात सूमारे $500 मिलियन मिळाले. आज ही रक्कम खूपच कमी वाटू शकते. पण, त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. विमानातून सोने परदेशात पाठवणे, हा दु:खद अनुभव होता.

पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी सुचली?रंगराजन सांगतात की, पुस्तक लिहिण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. 2014 मध्ये केंद्रात सरकार बदलल्यानंतर मी दिल्ली सोडली. मग मला वाटले की हीच योग्य वेळ आहे. तेव्हा माझ्या मनात काही शंका आल्या. रिझर्व्ह बँकेतील माझ्या कार्यकाळातील सर्व घटनांबद्दल लिहिणे शक्य नव्हते. मग, मी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला.

आजची महागाई, भूतकाळातील निर्णयांमुळेसी. रंगराजन म्हणतात की, राजकोषीय धोरण आणि चलनविषयक कठोरपणा यांच्यातील संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतील. काही प्रमाणात असे म्हणता येईल की, आज आपण जी महागाई पाहत आहोत, ती आपण आधी घेतलेल्या काही निर्णयांमुळे आहे. कोरोनाची लाट शिगेला असताना सर्वांनी सरकारला खर्च वाढवण्याचा सल्ला दिला होता. सरकारचा महसूल कमी होत असताना, हा निर्णय घ्यावा लागला. याचा परिणाम काय झाला? आणखी कर्ज घ्यावे लागले. 

रुपयावर काय म्हणाले?माजी गव्हर्नर म्हणतात की, भारतीय रुपयाबद्दल बोलायचे झाले तर, फंड्स देशातून अमेरिकेत जात आहेत. कारण तिथे इंटरेस्ट रेट जास्त आहेत. यामुळे रुपयाची व्हॅल्यू घसरत आहे. पण, आता हळुहळू रुपया सावरत आहा. याचे कारण म्हणजे, फंड्स बाहेर जाणे थांबले किंवा कमी झाले आहे. आता बाहेरुन फंड्स येणे सुरू झाले आहे. भारताच्या मॉनेटरी पॉलिसीने त्यावरही लक्ष देणे सुरू करायला हवे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकार